शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सिंचन अनुशेष दूर करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:13 AM

हिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे. आता तो दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने काही नवे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहण्याची आशा पल्लवीत झाली आहे.हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मुद्दा होता. त्यासाठी मागील अडीच वर्षांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही जोरदार पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी अनेकदा राज्यपाल के. विद्यासागर राव यांचीही त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर या अनुशेषाला मान्यता देण्यासाठी मार्गदर्शक सूचना शासनाकडून राज्यपालांनी मागविल्या होत्या. ३ जुलै २0१७ रोजी त्याचाही मसुदा त्यांना सादर झाला आहे. आता हा अनुशेष दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जलसंपदा व जलसंधारण विभागामार्फत हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची यादी, प्रकल्प उभारणीचे वार्षिक नियोजन, प्रस्तावित केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची सिंचनक्षमता, हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी अथवा वर्षे तसेच त्यासाठी लागणारा निधी याची माहिती राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडे मागितली आहे. तर जलसंपदा, जलसंधारण व रोहयो विभागासही ही बाब कळविली आहे.मागील काही दिवसांपासून या सिंचन अनुशेषावरून जोरदार चर्चा होत होती. नुसत्याच चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र यात काहीच होणार नाही, अशीही पुस्तीही जोडली जात होती. मात्र अखेर त्यात एकेक पुढचे पाऊल पडत असल्याने त्या सर्व बाबींना छेद देणारी ही बाब असून ही प्रक्रिया वेळेत झाल्यास निदान अनुशेष व निधीची तरतूद तरी होईल, हे मात्र नक्की.