शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आंदोलनाचे लोण पसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:50 IST

मराठा आरक्षण; परळीतील ठिय्या सुरूच, कळंब बंद; जालन्यात बसवर दगडफेक; काही ठिकाणी रास्ता रोको

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारीही सुरूच असून मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण मराठवाड्यात पसरले आहे. हिंगोलीपाठोपाठ जालन्यात बसवर दगडफेक झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंबला बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रास्ता रोको झाले.मेगा नोकरभरती रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही परळीतून परतणार नाही, अशी माहिती मराठा मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी रविवारी परळीत दिली. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे चक्काजाम आंदोलन झाले. भूम तालुक्यातील ईट येथे जाळपोळ झाली.नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. रविवारी ज्येष्ठ नागरिकांनी ठिय्या दिला़ जालन्यात बसवर दगडफेक झाली. मंठा येथे १२ आंदोलकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. भोकरदन येथेही रास्ता रोको झाले. परभणीत मानवत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. परभणी- पाथरी बसवर दगडफेक झाली.औरंगाबादला क्रांती चौकात आंदोलन सुरूच आहे. पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांना त्रास होईल, असे आम्ही काहीही करणार नाही. मात्र आमच्या नावावर अन्य कोणी अनुचित प्रकार घडवू शकते, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले. येथे शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे.सोलापुरात दोन दिवसांत ५० बस फोडल्यासकल मराठा समाजाने केलेल्या चक्काजाम आंदोलनात झालेल्या हिंसाचारात सोलापूर जिल्ह्यात २२ एसटी बसचे नुकसान झाले. शनिवार व रविवारी एकूण ५० बसचे ३० लाखांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री आंदोलकांनी दोन गाड्या पेटवून दिल्या. पंढरपुरात चक्का जाम आंदोलनाच्या भीतीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल : राज ठाकरेमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री हे राज्याची दिशाभूल करत असून, शासनाकडून ज्या नोकºया दिल्या जात आहेत त्याची टक्केवारी नगण्य आहे. खासगी क्षेत्रात यापेक्षा जास्त संधी आहेत, परंतु, खासगीत अद्याप आरक्षण लागू नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करू देण्यासाठीचे आंदोलन चुकीचे आहे. पंढरपूर हे आंदोलनाचे ठिकाण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.मुद्दा चिघळण्यास शासनच जबाबदार : राणेमराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने वेळेत आपले म्हणणे न्यायालयात सादर केले असते, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली असती तर निर्णय लगेचच लागला असता. मात्र, तसे न झाल्याने आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम पाळला आहे. यापुढे त्यांचा अंत शासनाने पाहू नये, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाAurangabadऔरंगाबाद