शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मराठवाड्यात आंदोलनाचे लोण पसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:50 IST

मराठा आरक्षण; परळीतील ठिय्या सुरूच, कळंब बंद; जालन्यात बसवर दगडफेक; काही ठिकाणी रास्ता रोको

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारीही सुरूच असून मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण मराठवाड्यात पसरले आहे. हिंगोलीपाठोपाठ जालन्यात बसवर दगडफेक झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंबला बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रास्ता रोको झाले.मेगा नोकरभरती रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही परळीतून परतणार नाही, अशी माहिती मराठा मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी रविवारी परळीत दिली. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे चक्काजाम आंदोलन झाले. भूम तालुक्यातील ईट येथे जाळपोळ झाली.नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. रविवारी ज्येष्ठ नागरिकांनी ठिय्या दिला़ जालन्यात बसवर दगडफेक झाली. मंठा येथे १२ आंदोलकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. भोकरदन येथेही रास्ता रोको झाले. परभणीत मानवत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. परभणी- पाथरी बसवर दगडफेक झाली.औरंगाबादला क्रांती चौकात आंदोलन सुरूच आहे. पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांना त्रास होईल, असे आम्ही काहीही करणार नाही. मात्र आमच्या नावावर अन्य कोणी अनुचित प्रकार घडवू शकते, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले. येथे शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे.सोलापुरात दोन दिवसांत ५० बस फोडल्यासकल मराठा समाजाने केलेल्या चक्काजाम आंदोलनात झालेल्या हिंसाचारात सोलापूर जिल्ह्यात २२ एसटी बसचे नुकसान झाले. शनिवार व रविवारी एकूण ५० बसचे ३० लाखांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री आंदोलकांनी दोन गाड्या पेटवून दिल्या. पंढरपुरात चक्का जाम आंदोलनाच्या भीतीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल : राज ठाकरेमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री हे राज्याची दिशाभूल करत असून, शासनाकडून ज्या नोकºया दिल्या जात आहेत त्याची टक्केवारी नगण्य आहे. खासगी क्षेत्रात यापेक्षा जास्त संधी आहेत, परंतु, खासगीत अद्याप आरक्षण लागू नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करू देण्यासाठीचे आंदोलन चुकीचे आहे. पंढरपूर हे आंदोलनाचे ठिकाण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.मुद्दा चिघळण्यास शासनच जबाबदार : राणेमराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने वेळेत आपले म्हणणे न्यायालयात सादर केले असते, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली असती तर निर्णय लगेचच लागला असता. मात्र, तसे न झाल्याने आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम पाळला आहे. यापुढे त्यांचा अंत शासनाने पाहू नये, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाAurangabadऔरंगाबाद