शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:16 IST

शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेडले. त्यामुळे मनपा प्रशासन त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देदुसºया दिवशीही काम बंद : मनपा प्रशासन त्रस्त

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेडले. त्यामुळे मनपा प्रशासन त्रस्त झाले आहे.घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, संकलित कचरा नियोजित प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम मनपाने बंगळुरूच्या पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. फेबु्रवारीपासून कंपनीने शहरात कचरा संकलन सुरू केले असून, सध्या सहा झोनमध्ये कंपनीकडून काम केले जात आहे. कंपनीने दोन महिन्यांचा पगार न दिल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीने थकीत वेतन द्यावे, यासाठी कामगारांना आंदोलन करावे लागत आहे. सोमवारी झोन ३ मधील कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा झोन क्रमांक २, ७ आणि ९ मधील कंपनीच्या सफाई कामगारांनी भाजपप्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच कामबंद आंदोलन केले. ६ पैकी ३ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद झाल्याची माहिती समजताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी रमानगर येथील केंद्रावर धाव घेत कामगारांची समजूत काढली. वेतन थकल्याने कामगार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महापौरांनी लेखाधिकारी महावीर पाटणी आणि घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना बोलावून दोन दिवसांत कामगारांचे वेतन करण्याचे निर्देश दिले. अखेर कामगारांनीही आंदोलन मागे घेतले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु झोन क्रमांक दोनचे काम दिवसभर ठप्पच होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न