शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

नांमकातून आवर्तनाला उशीर झाल्याने औरंगाबादेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागासमोर पाण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देऊन ठिय्या मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : कृती समितीच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभागासमोर पाण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देऊन ठिय्या मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान कालव्यात २.५८ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्यापैकी पाण्याचे आवर्तन उशिराने सुरू करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्यापैकी १.२८ टीएमसी पाणी सोडण्याचे जाहीर केल्याने आंदोलकांनी माघार घेतली.गंगापूर- वैजापूर तालुक्यातील नांमकाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांंनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली तसेच मंत्रालयातही आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी विषय मांडला तेव्हा तुम्ही पाण्यासाठी कोर्टात जाऊन दाद मागावी, अशी उत्तरे देण्यात आल्याने शेतकºयांनी १३ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर ठिय्या मांडून प्रचंड घोषणाबाजी सुरू केली.वैजापूर- गंगापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या नांदूर-मधमेश्वर कालव्याचे पाणी महिनाभरापासून आले नसल्याने संतप्त शेतकरी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर धडकले. यावेळी आ. सुभाष झांबड, आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, आ.प्रशांत बंब यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करून शेतकºयांसह एक शिष्टमंडळ कार्यकारी संचालक आ. प्र. कोहिटकर यांना भेटले. यावेळी शेतकºयांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी त्यांनी कालव्यातील पाण्याची सध्याच्या स्थितीची कल्पना दिली आणि पाणी गुरुवारपासून सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्यातून येणारे पाणी एक महिना उशिराने का सोडले आणि ते किती टीएमसी सोडणार इत्यादी विषयावर चर्चा झाली. २.५८ टीएमसी पाण्यातून अखेर १.२८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवर्तन झाले असून, पुन्हा उर्वरित मागण्यांविषयी २१ एप्रिल रोजी पुन्हा चर्चा करण्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी संतोष जाधव, भाऊसाहेब बारहाते, शिंदे तसेच गंगापूर- वैजापूर तालुक्यातील पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पाण्याचे आणले जार...पाणी व्यवस्थापन जनजागृती कृती समिती लाभधारक अन्यायग्रस्त शेतकºयांनी पाण्यासाठी आंदोलन केले अन् पोलीस व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग प्रशासनाचा गोंधळ उडाला. उन्हाचा पारा वाढलेला असताना संतप्त आंदोलकांना पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तुम्ही आंदोलन करा; परंतु तुम्ही पाणी प्या मी पण शेतकºयांचाच मुलगा आहे, असे म्हणून पाण्याचे जार आणून ठेवले. त्यावर आंदोलकांनीही थोडा संयम ठेवला.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी