शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 14:27 IST

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

औरंगाबाद : हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होऊन खाम नदीला पूर आला. त्यामुळेनदीच्या पात्रात घरे बांधून राहणाऱ्या सुमारे दोनशे कुटुंबांना शनिवारी  महापालिकेने सुरक्षित स्थळी हलविले. त्यांच्या घरातील साहित्य  ठेवण्यासाठी शाळेच्या खोल्यांची  व्यवस्थादेखील करून दिली.  जेसीबी आणि  पोकलेनच्या साहाय्याने पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. 

जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या भागातील ज्या नागरिकांनी नदीच्या पात्रात घरे बांधली होती त्या नागरिकांचे हाल झाले. त्यांनी  संपूर्ण रात्र जागून काढली. पुराची माहिती मिळाल्यावर पालिकेच्या वॉर्ड क्रं. ४ च्या कार्यालयतील कर्मचाऱ्यांना तातडीने पाहणी करून मदत करण्याचा  प्रयत्न केला. पण रात्रीमुळे ते शक्य झाले नाही. 

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रातील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. घरांचे बांधकाम न पाडता आजूबाजूचे बांधकाम हटवून हे काम करण्यात आल्याची माहिती वॉर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदीfloodपूर