शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 14:27 IST

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

औरंगाबाद : हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होऊन खाम नदीला पूर आला. त्यामुळेनदीच्या पात्रात घरे बांधून राहणाऱ्या सुमारे दोनशे कुटुंबांना शनिवारी  महापालिकेने सुरक्षित स्थळी हलविले. त्यांच्या घरातील साहित्य  ठेवण्यासाठी शाळेच्या खोल्यांची  व्यवस्थादेखील करून दिली.  जेसीबी आणि  पोकलेनच्या साहाय्याने पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. 

जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या भागातील ज्या नागरिकांनी नदीच्या पात्रात घरे बांधली होती त्या नागरिकांचे हाल झाले. त्यांनी  संपूर्ण रात्र जागून काढली. पुराची माहिती मिळाल्यावर पालिकेच्या वॉर्ड क्रं. ४ च्या कार्यालयतील कर्मचाऱ्यांना तातडीने पाहणी करून मदत करण्याचा  प्रयत्न केला. पण रात्रीमुळे ते शक्य झाले नाही. 

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या शाळेची निवड  करण्यात आली. 

जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रातील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. घरांचे बांधकाम न पाडता आजूबाजूचे बांधकाम हटवून हे काम करण्यात आल्याची माहिती वॉर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदीfloodपूर