शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते मोतीराज राठोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:52 IST

महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली.

ठळक मुद्दे अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता.

औरंगाबाद : भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते, विद्यापीठ नामांतर लढ्यातील अग्रणी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोतीराज राठोड यांचे आज दुपारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

राठोड यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या बंजारा कॉलनीतील निवासस्थानी चळवळीतील कार्यकर्त्यांची, बंजारा समाजाच्या स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी झाली. गेल्या काही वर्षांपासून प्रा. राठोड हे कॅन्सरसारख्या आजाराशी मुकाबला करीत होते. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राठोड यांच्या पश्चात पत्नी कला राठोड, दोन मुले, मुलगी, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. 

प्रा.  राठोड यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली. अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता. प्रा. राठोड यांचा जन्म २ सप्टेंबर १९४३ रोजी दिंडाळा तांडा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे झाला. १९६३ मध्ये नगरपालिकेत नाका कारकुनाची नोकरी करतानाच एम.ए. (मराठी), एम.ए. (हिंदी), एम.फिल.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठ नामांतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता. राज्य व राष्ट्रीय  पातळीवरील साहित्य अकादमीपासून ते विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले.

‘कबीरां’चे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड हे संत कबीरांचे, त्यांचे दोहे आणि भजनांचे अत्यंत गाढे अभ्यासक होते. कबीरांवर त्यांनी विपुल लेखन केले आणि कबीरांवर ते तासन्तास बोलू शकत होते. ‘कबीरा खडा बाजार में, लिये लुकाटी हाथ, जो घर फुंके अपना चलो हमारे साथ’ हे ठासून सांगताना प्रा. राठोड कमालीचे खुलत. 

प्रा. राठोड यांची विपुल ग्रंथसंपदाप्रा. राठोड यांनी विपुल लेखन केले. बंजारा संस्कृती, कबीर-जोतिबा, कहत कबीर, तांडा संस्कृती, भटक्या-विमुक्तांचा जाहीरनामा, समाज और संस्कृती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, कबीरवाद, गोरमाटी, गोर बंजारा जनजाती का इतिहास, गोर बंजारा जागतो रेस, गोर बंजारा वंशाचा इतिहास, गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम, पाल निवासी भटक्या जमाती, सिंधू संस्कृतीपूर्व गोर संस्कृती नांदत होती, लदेणी, बंजारा संस्कृती और ऋग्वेदकालीन संस्कृती तुलनात्मक अध्ययन, बंजारा लोकसाहित्य का संकलन और विश्लेषण, याडी उद्ध्वस्त तांडा कथा, मी आणि चळवळ, कायीं ठाली कायीं भरी बाते, प्राचीन बंजारा समाज व्यवस्था, नोटिफाईड ट्राईब्ज नोमॅडिक ट्राईब्ज ही पुस्तके त्यांनी लिहिली.

टॅग्स :Deathमृत्यूsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद