शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नातेवाईकाचे लग्न आटोपून गावी जाणाऱ्या माय-लेकावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 12:10 IST

नवीन बायपासवरून जाताना गांधेली शिवारात समोरून भरधाव येणाऱ्या कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली.

ठळक मुद्देकार- दुचाकीचा अपघातात दोघेही माय-लेक जागीच ठारनवीन बायपासवर गांधेली शिवारातील दुर्घटना

औरंगाबाद : वाळूज येथे राहणाऱ्या भाच्याचे लग्न आटोपून दुचाकीवरून गावी निघालेल्या माय-लेकास समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही माय-लेक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नवीन बायपास रोडवरील गांधेली शिवारात घडली.

कौशल्याबाई किशन धोत्रे (४५) व ज्ञानेश्वर किसन धोत्रे (२५, दोघेही रा. राजपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), अशी या अपघातात मरण पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत. वाळूज येथे कौशल्याबाई धोत्रे यांचा भाऊ राहत असून त्याच्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नसमारंभ व पाहुणचार घेऊन हे दोघे माय-लेक रविवारी दुपारी सोलापूर- धुळे महामार्गाच्या नवीन बीड बायपासवरून मोटारसायकलने (एमएच२३- व्ही- १८६२) गावी निघाले होते. नवीन बायपासवरून जाताना गांधेली शिवारात समोरून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच २०- इइ- ७४५५) ज्ञानेश्वर चालवत असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे माय-लेक हे दूरवर फेकले गेले. दुचाकी व कारचेही या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, सहायक फौजदार काशिनाथ लुटे आणि हवालदार संपत राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच जखमी माय-लेक व कारचालक रावसाहेब बाबूराव मदगे (रा. एकोड पाचोड, ता. औरंगाबाद) यांना घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. कारचालक रावसाहेब मदगे हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद