शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST

ऑडिटनंतर प्रशासनाला जाग, ४६४ जणांकडून वसूल केले ३९ लाख; २ हजार लाभार्थ्यांची साधली चुप्पी

- प्रवीण जंजाळकन्नड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत २०२२-२३ मध्ये महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली असून, आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे जमा केले असून, १ हजार ९३१ शेतकऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत अनुदान परतीकडे दुर्लक्ष केले आहे.

राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या निकषानुसार अनुदान देण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या वर्षात शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान दिले होते. सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर शेतकऱ्यांनी उचलून खर्चही केली. याबाबत केलेल्या लेखा परीक्षणात जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच ज्या बँकेतून संबंधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले त्या बँकांनाही पत्र देण्यात आले. त्यानंतर ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे युपीआय व आरटीजीएसद्वारे जमा केले. १ हजार ९३१ शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी पैसे परत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करावेत तरी कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

३१२ शेतकऱ्यांकडून अधिकची वसुलीदरम्यान, जिल्ह्यातील ३१२ शेतकऱ्यांकडून अधिकचे अनुदान वसूल करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडून महसूल विभाग आणि बँका या दोन्ही यंत्रणांनी पैसे वसूल केले. आता हे शेतकरी एक रक्कम परत मागण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

कन्नड तालुक्यात सर्वाधिक वसुलीकन्नड तालुक्यात सन २०२२-२३मध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतील पीक नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले होते. यापैकी ६१६ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा पीक नुकसानीचे अनुदान वाटप झाले होते. त्यापैकी ३१२ शेतकऱ्यांकडून २४ लाख २० हजार ७६२ रुपये वसूल करण्यात आले असून, हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

दोन वेळा अनुदान घेतलेले जिल्ह्यातील शेतकरी असेकन्नड तालुका- ६१६ पैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे जमा केलेगंगापूर - ७पैकी ३ शेतकऱ्यांनी १७ हजार ८५० रुपये जमा केलेपैठण - १८पैकी एकाही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.फुलंब्री - २०पैकी १४ शेतकऱ्यांनी ८३ हजार ४८७ रुपये परत केले.सिल्लोड - ६१०पैकी १३५ शेतकऱ्यांनी १४ लाख ५७ हजार ६१४ रुपये जमा केले.सोयगाव- ५३पैकी ४ शेतकऱ्यांनी १० हजार ३३६ रुपये परत केले.वैजापूर - ७९०पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.छत्रपती संभाजीनगर - २८५पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.खुलताबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अधिकचे अनुदान मिळाले नाही.

रक्कम परत घेतलीसॉप्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पेक्षा अधिक वेळा रक्कम गेली होती. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने ९० टक्केंच्यावर रक्कम शासन खात्यात जमा झाली आहे.- विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँक