शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST

ऑडिटनंतर प्रशासनाला जाग, ४६४ जणांकडून वसूल केले ३९ लाख; २ हजार लाभार्थ्यांची साधली चुप्पी

- प्रवीण जंजाळकन्नड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत २०२२-२३ मध्ये महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली असून, आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे जमा केले असून, १ हजार ९३१ शेतकऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत अनुदान परतीकडे दुर्लक्ष केले आहे.

राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या निकषानुसार अनुदान देण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या वर्षात शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान दिले होते. सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर शेतकऱ्यांनी उचलून खर्चही केली. याबाबत केलेल्या लेखा परीक्षणात जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच ज्या बँकेतून संबंधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले त्या बँकांनाही पत्र देण्यात आले. त्यानंतर ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे युपीआय व आरटीजीएसद्वारे जमा केले. १ हजार ९३१ शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी पैसे परत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करावेत तरी कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

३१२ शेतकऱ्यांकडून अधिकची वसुलीदरम्यान, जिल्ह्यातील ३१२ शेतकऱ्यांकडून अधिकचे अनुदान वसूल करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडून महसूल विभाग आणि बँका या दोन्ही यंत्रणांनी पैसे वसूल केले. आता हे शेतकरी एक रक्कम परत मागण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

कन्नड तालुक्यात सर्वाधिक वसुलीकन्नड तालुक्यात सन २०२२-२३मध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतील पीक नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले होते. यापैकी ६१६ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा पीक नुकसानीचे अनुदान वाटप झाले होते. त्यापैकी ३१२ शेतकऱ्यांकडून २४ लाख २० हजार ७६२ रुपये वसूल करण्यात आले असून, हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

दोन वेळा अनुदान घेतलेले जिल्ह्यातील शेतकरी असेकन्नड तालुका- ६१६ पैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे जमा केलेगंगापूर - ७पैकी ३ शेतकऱ्यांनी १७ हजार ८५० रुपये जमा केलेपैठण - १८पैकी एकाही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.फुलंब्री - २०पैकी १४ शेतकऱ्यांनी ८३ हजार ४८७ रुपये परत केले.सिल्लोड - ६१०पैकी १३५ शेतकऱ्यांनी १४ लाख ५७ हजार ६१४ रुपये जमा केले.सोयगाव- ५३पैकी ४ शेतकऱ्यांनी १० हजार ३३६ रुपये परत केले.वैजापूर - ७९०पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.छत्रपती संभाजीनगर - २८५पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.खुलताबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अधिकचे अनुदान मिळाले नाही.

रक्कम परत घेतलीसॉप्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पेक्षा अधिक वेळा रक्कम गेली होती. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने ९० टक्केंच्यावर रक्कम शासन खात्यात जमा झाली आहे.- विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँक