शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

राज्यातील बारमाही नद्यांकाठीच ‘ताम्रपाषाण’ युगातील २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:20 IST

‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

औरंगाबाद : ज्या नद्यांना बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध आहे. अशा नद्यांकाठीच ताम्र पाषाण युगात वसाहती वसल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जी. के. माने यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डॉ. आर. एस. गुप्ते व्याख्यानमालेला गुरुवारी सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यात ‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

ते म्हणाले, गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जननी आहे. या नदीच्या  खोऱ्यातच संस्कृतीचा जन्म झाला. राज्यात ताम्रपाषाणकालीन संस्कृतीच्या २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात आल्या आहेत. त्यापैकी नगर जिल्ह्यातील दायमाबाद ही खऱ्या अर्थाने  ताम्रपाषाणयुगाची सर्वसमावेशक अशी वसाहत आहे़  या संस्कृतीच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे, ज्याठिकाणी नद्यांना बारमाही पाण्याचा साठा आहे आणि लगतच शेतीला उपयुक्त जमीन आहे. यातूनच वसाहतींचा विकास होत गेला. तापी, गिरणा, भीमा, कृष्णा, निरा, कऱ्हा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात ही संस्कृती अधिक वाढली. या वसाहतीचा १९५० साली जोव येथे शोध लागला. त्यानंतर नेवासे, प्रकाशे, बहाळ, सोनेगाव, आपेगाव, दायमाबाद, इनामगाव, वाकढी, कवठे, रंजाळे, तुळजापूर गढी, आडम, तारसा याठिकाणी उत्खनन करून ताम्रपाषाण संस्कृतीचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करता आल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  डॉ. गीतांजली बोराडे,  कुमार भवर, डॉ. अमोल कुलकर्णी, प्रा.संजय पाईकराव, सुधीर बलखंडे, मच्छिंद्र चौधरी, प्रबुद्ध म्हस्के, सोनाली म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणriverनदीMaharashtraमहाराष्ट्र