शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पडलाच नाही; भोंदूबाबाने हैद्राबादच्या दोघांना लावला ११ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:09 IST

पैशांचा पाऊस पडून ७ कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष 

ठळक मुद्देसुरुवातीला विधी सुरु करण्याच्या नावाखाली २ लाख रुपये घेतले यानंतर दोघांना उरलेली रोख रक्कम आणि धनादेश घेऊन बोलावले लातूरजवळ पोलिसांनी धमकावल्याचे नाटक

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांची औरंगाबादेतील भोंदूबाबाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ११ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार ४ मे रोजी घडला. भोंदूबाबाने मागणी केलेले पैसे देऊनही पैशांचा पाऊस तर पडला नाहीच; पण दोघांना लाखोंचा चुना लागला.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद येथील डी. सत्यनारायण आणि त्यांचे मित्र सय्यद जहांगीर सय्यद अब्दुल अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. सत्यनारायण हे चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून आठ ते दहा वर्षांपासून काम करतात. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी त्यांचा मित्र सय्यद जहांगीर याला सांगितले होते. जहांगीरच्या ओळखीचा सुरेश खत्री याने औरंगाबादेतील साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबा हा खूप करामती आहे. तो तुमची परेशानी २५ लाख रुपयांत दूर करू शकतो, असे तीन वर्षांपासून सांगत होता. यानंतर त्यांचे औरंगाबादेतील साहेब खानशी मोबाईलवर बोलणे झाले. तेव्हा त्याने २५ लाख रुपये औषधांसाठी लागतात. ही रक्कम तुम्ही दिल्यास तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये देतो, असे सांगितले. एवढे पैसे नसल्याचे दोन्ही मित्रांनी त्यास सांगितले.

साहेब खानच्या सांगण्यावरून फेब्रुवारी महिन्यात दोन्ही मित्र औरंगाबादेत आले आणि जळगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले. तेव्हा तेथे साहेब खान आला. तेव्हाही दोन्ही मित्रांनी त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्ही किती देऊ शकता, असे विचारले असता त्यांनी त्यांना दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावेळी तो म्हणाला की, दोन लाख रुपये द्या, मी विधी सुरू करतो. त्याच्यावर विश्वास ठेवून दोन्ही मित्रांनी त्यास दोन लाख रुपये दिले. दरम्यान, साहेब खानने त्यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्यांच्याकडे केवळ साडेसहा लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले. तेव्हा ही रक्कम आणि दोन चेक घेऊन औरंगाबादेत बोलावले. ४ मे रोजी सय्यद जहांगीर आणि डी. सत्यनारायण शहरात आले आणि जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये थांबले. तेथे साहेब खान आला. 

दोघांना कारमधून नेले लातूरकडेलातूरकडे साहेब खान ऊर्फ सत्तार बाबाने ४ मे रोजी हॉटेलमध्ये सय्यद जहांगीर आणि डी. सत्यनारायण यांच्याकडून साडेसहा लाख रुपये आणि अडीच लाखांचे दोन धनादेश घेतले. यानंतर ४ वाजेच्या सुमारास तो स्वत:च्या कारमध्ये सय्यद आणि डी. सत्यनारायण यांना बसवून हैदराबादकडे निघाला. औरंगाबादपासून शंभर ते दीडशे किलोमीटरवर रस्त्यात आपल्याला विधीसाठी लागणारे औषध मिळणार असल्याचे म्हणाला. त्यानुसार त्याने रस्त्यात पेट्रोलपंपाजवळ कार थांबविली. त्यानंतर त्याच्या ओळखीचा एक जण तेथे आला आणि त्याने औषधाच्या दोन-तीन बाटल्या साहेब खानला दिल्या. साहेब खानने साडेसहा लाखांच्या रोकडपैकी काही रक्कम त्याला दिली. त्यानंतर तो त्यांना म्हणाला की, आता सर्व साहित्य आले आहे. आता आपण हैदराबादला जाऊ आणि तुमचा विधी करू, असे म्हणून पुढील प्रवासाला निघाले. 

पोलिसांनी धमकावलेलातूरपासून काही अंतरावर ते असताना साहेब खानने पुन्हा कार थांबविली. त्याचवेळी पोलिसांची गाडी तेथे आली. यावेळी एक जण पोलिसांच्या युनिफॉर्मवर होता, तर अन्य तिघे सिव्हिल ड्रेसवर. तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ येऊन तुम्ही कोण आहात, येथे काय करता, असे विचारले. त्यावेळी घाबरलेल्या सत्यनारायण आणि जहांगीर यांनी त्यांना साहेब खानची लिफ्ट घेतल्याचे खोटे सांगितले. साहेब खानजवळील पिशवीत औषधाच्या बाटल्या, लिंबू, पांढरे दगड, अगरबत्ती आदी वस्तू पाहून तुम्ही जादूटोणा करता क ा, असे ओरडून साहेब खानवर एका पोलिसाने लाठी उगारली. यावेळी एक  पोलीस कर्मचारी कारमध्ये बसून साहेब खानला पोलीस ठाण्यात चल, असे म्हणून घेऊन गेला, तर इतर पोलिसांनी त्याच्या जीपमध्ये सत्यनारायण आणि जहांगीर यांना बसविले आणि काही अंतरावर नेल्यांनतर उतरवून देत एका एस.टी. बसमध्ये बसवून दिले.  

दगाबाजी झाल्याचे लक्षात येताच आले औरंगाबादलासाहेब खानने आपल्यासोबत दगाबाजी केल्याचे लक्षात येताच सत्यनारायण आणि जहांगीर हे पहाटे पाच वाजेच्या सुमारास एस.टी. बसने औरंगाबादेत परतले. त्यानंतर त्यांनी साहेब खानचे घर गाठले. मात्र, तो घरी नसल्याचे त्याच्या मुलाने त्यांना सांगितले. मात्र, औषधी बाटल्या देण्यासाठी रस्त्यात हाच तरुण आला होता, हे दोन्ही मित्रांच्या लक्षात आले. यानंतर साहेब खानविरोधात तक्रार देण्यासाठी ते सिडको ठाण्यात गेले; परंतु ९ मेपर्यंत त्यांचा अर्जच घेण्यात आला नाही. आज त्यांचा अर्ज घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद