शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

'मोदीजी, महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी निर्णय घ्या'; तरुणाईचे प्रधानमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 18:05 IST

देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे

औरंगाबाद : हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे अशा मागणीचे पत्र थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

या पत्रातील मजकुराचा सारांश असा : मा. प्रधानमंत्री, स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्ष झाले असून आपण विविध क्षेत्रात आमुलाग्र प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात महिलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकलो नाही. हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जनतेच्या मनात तीव्र राग आहे. प्रत्येकजण तुम्ही यावर काय बोलणार याची वाट पाहत आहे. आपण तरुणांना उद्याचे भविष्य असे म्हटले आहे. हिच तरुणाई आपल्याला विनंती करत आहे की, अशा गुन्ह्यात कडक कायद्याची अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. आम्ही आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.  

तरुणांच्या प्रतिक्रिया :

स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला समाजातील पितृसत्ताक मानसिकता संपुष्टात आणली तरच अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांना आळ बसेल. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तरच त्या सुरक्षित राहतील. हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी.  - महिमा सांबरे

कठोर शिक्षा व्हावी न्यायालयाने त्या नराधमांना कठोर शिक्षा करावी. जेणे करून अशा हिंसक कृत्यांना आळा बसेल.- अक्षय दराडे

कायद्यात कालानुरूप बदल करावेत सरकारने वेळोवेळी स्त्रियांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन कायद्यात काळानुसार बदल करावा. ही मागणी पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना करत आहोत. हैद्राबाद येथील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी.       - आशिष जावळे

विशेष न्यायालय स्थापन करा

प्रियंका रेड्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारच्या घटना रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर करत तात्काळ शिक्षा सुनावण्याची तरतुद करण्याची गरज आहे. त्याच बरोबर जिल्हा व तालुका पातळीवर बलात्काराच्या खटल्यांची तातडीने सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे.    - मनीषा भ. घायवट

कठोर शासन करावे आरोपींना कठोर शासन करावे, जेणेकरून यापुढे कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. - सिंथिया व्हीगेट

केसचा तत्काळ निकाल लावा तुम्ही एका रात्रीत सरकार बनवू शकता मग एका दिवसात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देणारा कायदा का करू शकत नाही ? विरोधकांनी देखील 70 वर्षे जुन्या घटनेवर न बोलता या बद्दल सरकारला घेरले पाहिजे.- नवनीतकुमार तापडिया

टॅग्स :prime ministerपंतप्रधानWomenमहिलाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद