शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मोबाईल ‘कोड’ने तरुण संकटात

By admin | Updated: April 18, 2016 00:51 IST

औरंगाबाद : मित्राला घेऊन लग्नाला गेलेल्या एका तरुणाच्या दुचाकीला माघारी परतताना अमरप्रीत हॉटेल चौकात कुत्रे आडवे आल्यामुळे अपघात झाला.

औरंगाबाद : मित्राला घेऊन लग्नाला गेलेल्या एका तरुणाच्या दुचाकीला माघारी परतताना अमरप्रीत हॉटेल चौकात कुत्रे आडवे आल्यामुळे अपघात झाला. शनिवारी मध्यरात्री १२.३५ वाजता ही घटना घडली. यावेळी रस्त्यावर फारसी वर्दळही नव्हती; परंतु मदत करणाऱ्यांनी त्याचा मोबाईल घेऊन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, तर मोबाईलला ‘पिन कोड’ असल्यामुळे अडचणी आल्या. दामिनी पथकाच्या गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतील तरुणाला घाटीत दाखल केले. त्यांनीही त्याच्या नातेवाईकांना ही माहिती कळविण्याचा प्रयत्न केला पण ‘पिन कोड’ असल्यामुळे संपर्क साधता आला नाही.याबाबत दामिनी पथकाच्या फौजदार अरुणा घुले यांनी सांगितले की, अलोक फ्रान्सिस फर्नांडिस (२४, रा. ख्रिस्तनगर, छावणी) हा मित्राला घेऊन लग्नाला गेला होता. माघारी परतताना त्याने कॅनॉट परिसरात मित्राला सोडले. तो दुचाकी (क्र. एमएच २० सीई ४३१९) वरून घराकडे जात होता. जालना रोडवर अमरप्रीत चौकात अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे अलोक रस्त्यावर पडला. डोक्यात हेल्मेट असल्याने त्याचा जीव वाचला; पण तो बेशुद्ध पडला. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे वाहनांची गर्दीही कमी होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांपैकी काहींनी त्याचा मोबाईल घेऊन नातेवाईकाचा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण ‘पिन कोड’ असल्यामुळे ते शक्य झाले नाही.दामिनी पथकाचे कर्मचारी एस. एम. बहिरव, महिला पोलीस कॉन्स्टेबल एस.बी. बनसोडे, पी. आर. शहाणे, पी. बी. पठाण आणि चालक वैशाली ढेपे यांनी अलोकला घाटीत दाखल केले. उपचारानंतर अलोक शुद्धीवर आला. त्यानंतर या अपघाताची माहिती त्याची बहीण वैशालीला देण्यात आली. तिचा जबाब घेण्यात आला असून अलोकवर सध्या छावणीतील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.