शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक, महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 13:14 IST

MNS Aurangabad aggressive on water issue: शहरातील काही वसाहतींना पाचव्या दिवशी तर काही वसाहतींना थेट दहाव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे'सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला पालिकेचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे'

औरंगाबाद: शहराच्या पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती. ही मागणी 10 दिवसात मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता. त्यानुसार आज पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी हे नळ कनेक्शन तोडले.

गेल्या पंधरवड्यात मनसेने पाणीपट्टी कमी करा, किमान दोन दिवसाआड पाणीपूरवठा करा, या मागणीसाठी पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना इशारा दिला होता. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला पालिकेचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. असा आरोप मनसेने केला होता. दोन दिवसांपूर्वी आयुक्त पांडेय यांना पत्र देऊन मनसेने अलर्ट केले होते.

शहरातील काही वसाहतींना पाचव्या दिवशी तर काही वसाहतींना थेट दहाव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे मनपा प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील निवासस्थानात जाणारे पाण्याचे कनेक्शन तोडले. मुळातच मनसेकडून तोडण्यात आलेले नळ कनेक्शन बंगल्याच्या उद्यानातील झाडांसाठी एका विहिरीवरून घेण्यात आले होते. मागील काही वर्षापासून याचा वापरही नाही. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मनपाने दुपारनंतर सुरू केली.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादWaterपाणी