शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक, महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 13:14 IST

MNS Aurangabad aggressive on water issue: शहरातील काही वसाहतींना पाचव्या दिवशी तर काही वसाहतींना थेट दहाव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे'सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला पालिकेचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे'

औरंगाबाद: शहराच्या पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती. ही मागणी 10 दिवसात मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता. त्यानुसार आज पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांनी हे नळ कनेक्शन तोडले.

गेल्या पंधरवड्यात मनसेने पाणीपट्टी कमी करा, किमान दोन दिवसाआड पाणीपूरवठा करा, या मागणीसाठी पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना इशारा दिला होता. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने सामान्य नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला पालिकेचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. असा आरोप मनसेने केला होता. दोन दिवसांपूर्वी आयुक्त पांडेय यांना पत्र देऊन मनसेने अलर्ट केले होते.

शहरातील काही वसाहतींना पाचव्या दिवशी तर काही वसाहतींना थेट दहाव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे मनपा प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील निवासस्थानात जाणारे पाण्याचे कनेक्शन तोडले. मुळातच मनसेकडून तोडण्यात आलेले नळ कनेक्शन बंगल्याच्या उद्यानातील झाडांसाठी एका विहिरीवरून घेण्यात आले होते. मागील काही वर्षापासून याचा वापरही नाही. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मनपाने दुपारनंतर सुरू केली.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादWaterपाणी