शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदार, मंत्री शिवसेनेचा तरीही औरंगाबादमधील बायपासचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:33 IST

बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत.

- राम शिनगारे 

औरंगाबाद :  बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत. नागरिकांचा यात नाहक बळी जात असून, शासकीय, राजकीय पातळीवर काहीही होत नाही. या भागाचे आमदार, खासदार, महापौर  शिवसेनेचे आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्रीपदही शिवसेनेकडेच आहे. तरीही हा प्रश्न सोडविण्यात सेना नेते अपयशी ठरले आहेत. नव्हे त्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

बीड बायपासवर सर्व्हिस रोड नाही. रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. राजकीय वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे महापालिका तोडत नाही. यातच बीड, नागपूरकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्यामुळे सतत दुचाकीस्वारांचे अपघात होतात. मागील महिनाभरापासून तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. याशिवाय बीड बायपासवर सतत ट्रॅफिक जाम होत आहे. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. बीड बायपासचे रुंदीकरण, सर्व्हिस रस्ता, लिंक रस्ता आणि पैठण रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

सर्वच सत्तापदे शिवसेनेकडे असली तरीही हा प्रश्न सुटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच शिवसेना नेतृत्वाकडे नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. शुक्रवारी बायपासवर भीषण अपघात झाला. हा अपघात होताच शिवसेना आमदार संजय शिरसाट हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. तेव्हाच पोलीस यंत्रणाही दाखल झाली. पुन्हा एकदा वाहतुकींचे नियम पाळण्यासाठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’. बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांची गर्दी दिसून आली.

तिसऱ्या दिवसांपासून अवजड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बंद करण्याचा निर्णय झाला. हा निर्णयही पहिल्याच दिवशी अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड बायपास रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे. हा रस्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याही मतदारसंघात येतो. त्यांनीही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. शिवसेना नेते व खासदार चंद्रकांत खैरे यांचेही त्याकडे लक्ष नाही. आ.संजय शिरसाट यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ, शासन दरबारी किती वेळा आवाज उठविला. हा संशोधनाचाच भाग आहे.

सातारा, देवळाई भागात दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेनेचे पानिपत झाले. तेव्हापासून शिवसेनेने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. राजकीय कुरघोडीपायी सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. आता काही दिवसांवर आलेल्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांना हा प्रश्न सोडविण्याचा पुळका येईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. मात्र त्यातून काहीही होणार नाही. हे आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून गृहीतच धरावे लागणार आहे.

१५० कोटीतून बायपासचे रुंदीकरण का नाहीराज्य सरकारने शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपये दिले आहेत. या पैशातून सातारा-देवळाईसह शिवाजीनगर, प्रतापनगर, मुस्तफाबाद, एमआयटी कॉलेज परिसर, रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांनाही या रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी १५० कोटीतून हा रस्ता का केला जात नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना