शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आमदार, खासदार, मंत्री शिवसेनेचा तरीही औरंगाबादमधील बायपासचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:33 IST

बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत.

- राम शिनगारे 

औरंगाबाद :  बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत. नागरिकांचा यात नाहक बळी जात असून, शासकीय, राजकीय पातळीवर काहीही होत नाही. या भागाचे आमदार, खासदार, महापौर  शिवसेनेचे आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्रीपदही शिवसेनेकडेच आहे. तरीही हा प्रश्न सोडविण्यात सेना नेते अपयशी ठरले आहेत. नव्हे त्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

बीड बायपासवर सर्व्हिस रोड नाही. रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. राजकीय वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे महापालिका तोडत नाही. यातच बीड, नागपूरकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्यामुळे सतत दुचाकीस्वारांचे अपघात होतात. मागील महिनाभरापासून तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. याशिवाय बीड बायपासवर सतत ट्रॅफिक जाम होत आहे. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. बीड बायपासचे रुंदीकरण, सर्व्हिस रस्ता, लिंक रस्ता आणि पैठण रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

सर्वच सत्तापदे शिवसेनेकडे असली तरीही हा प्रश्न सुटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच शिवसेना नेतृत्वाकडे नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. शुक्रवारी बायपासवर भीषण अपघात झाला. हा अपघात होताच शिवसेना आमदार संजय शिरसाट हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. तेव्हाच पोलीस यंत्रणाही दाखल झाली. पुन्हा एकदा वाहतुकींचे नियम पाळण्यासाठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’. बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांची गर्दी दिसून आली.

तिसऱ्या दिवसांपासून अवजड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बंद करण्याचा निर्णय झाला. हा निर्णयही पहिल्याच दिवशी अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड बायपास रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे. हा रस्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याही मतदारसंघात येतो. त्यांनीही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. शिवसेना नेते व खासदार चंद्रकांत खैरे यांचेही त्याकडे लक्ष नाही. आ.संजय शिरसाट यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ, शासन दरबारी किती वेळा आवाज उठविला. हा संशोधनाचाच भाग आहे.

सातारा, देवळाई भागात दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेनेचे पानिपत झाले. तेव्हापासून शिवसेनेने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. राजकीय कुरघोडीपायी सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. आता काही दिवसांवर आलेल्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांना हा प्रश्न सोडविण्याचा पुळका येईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. मात्र त्यातून काहीही होणार नाही. हे आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून गृहीतच धरावे लागणार आहे.

१५० कोटीतून बायपासचे रुंदीकरण का नाहीराज्य सरकारने शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपये दिले आहेत. या पैशातून सातारा-देवळाईसह शिवाजीनगर, प्रतापनगर, मुस्तफाबाद, एमआयटी कॉलेज परिसर, रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांनाही या रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी १५० कोटीतून हा रस्ता का केला जात नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना