शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मंत्री सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; वादग्रस्त वक्तव्य करत पोलिसांना दिले लाठीचार्जचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:03 IST

एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त वक्तव्य करत दिले पोलिसांना लाठीचार्जचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम बुधवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, हा प्रकार पाहून संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यावेळी मंत्री सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त आदेश पोलिसांना दिले. यावरून आता मंत्री सत्तार यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आल्याने मंत्री अब्दुल संतापले. माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचत त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या मंत्री सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार एवढयावर थांबले नाही तर गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा. त्यांचे हाड मोडा. येथे एक हजार पोलीस आहेत, ५० हजार लोकांना मारायला काय लागते असे धक्कादायक वक्तव्य केले.

विरोधी पक्ष नेत्यांची टीकादरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारोंच्या गर्दी समोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का?...सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम? अशी टीका केली आहे. तसेच आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील, महायुती सरकारची हीच संस्कृती आहे. त्यांनी खरा चेहरा समोर आणला अशी टीका केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAmbadas Danweyअंबादास दानवे