शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मंत्री सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; वादग्रस्त वक्तव्य करत पोलिसांना दिले लाठीचार्जचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:03 IST

एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त वक्तव्य करत दिले पोलिसांना लाठीचार्जचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम बुधवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, हा प्रकार पाहून संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यावेळी मंत्री सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त आदेश पोलिसांना दिले. यावरून आता मंत्री सत्तार यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आल्याने मंत्री अब्दुल संतापले. माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचत त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या मंत्री सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार एवढयावर थांबले नाही तर गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा. त्यांचे हाड मोडा. येथे एक हजार पोलीस आहेत, ५० हजार लोकांना मारायला काय लागते असे धक्कादायक वक्तव्य केले.

विरोधी पक्ष नेत्यांची टीकादरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारोंच्या गर्दी समोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का?...सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम? अशी टीका केली आहे. तसेच आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील, महायुती सरकारची हीच संस्कृती आहे. त्यांनी खरा चेहरा समोर आणला अशी टीका केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAmbadas Danweyअंबादास दानवे