शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

मंत्री सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; वादग्रस्त वक्तव्य करत पोलिसांना दिले लाठीचार्जचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:03 IST

एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त वक्तव्य करत दिले पोलिसांना लाठीचार्जचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम बुधवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, हा प्रकार पाहून संतापलेल्या मंत्री अब्दुल सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यावेळी मंत्री सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त आदेश पोलिसांना दिले. यावरून आता मंत्री सत्तार यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आल्याने मंत्री अब्दुल संतापले. माईक घेऊन थेट स्टेजवर पोहचत त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरुण काही ऐकायला तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या मंत्री सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार एवढयावर थांबले नाही तर गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा. त्यांचे हाड मोडा. येथे एक हजार पोलीस आहेत, ५० हजार लोकांना मारायला काय लागते असे धक्कादायक वक्तव्य केले.

विरोधी पक्ष नेत्यांची टीकादरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजारोंच्या गर्दी समोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का?...सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम? अशी टीका केली आहे. तसेच आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील, महायुती सरकारची हीच संस्कृती आहे. त्यांनी खरा चेहरा समोर आणला अशी टीका केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAmbadas Danweyअंबादास दानवे