शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘एमआयएम देशासाठी धोका’- अबू आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:19 IST

‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला.

ठळक मुद्देएमआयएमचा माजी प्रदेशाध्यक्ष समाजवादी पार्टीत

औरंगाबाद : ‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. नांदेडहून हे कार्यकर्ते अनेक वाहनांनी औरंगाबादला पोहोचले होते.

सुभेदारी गेस्ट हाऊसवर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने झालेल्या पत्रपरिषदेत आझमी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नरेंद्र मोदी व भाजपच्या सध्याच्या वाटचालीवर त्यांनी सडकून टीका केली. कायदा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. जे भाजपबरोबर ते देशप्रेमी आणि जे नाहीत ते देशद्रोही, असे सध्या चालू आहे. नॉन इश्यूज् निर्माण करून हिंदू- मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला जात आहे. मुस्लिम आणि दलित समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. हे राष्ट्र हिंदूराष्ट्र होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे आझमी यांनी नमूद केले.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, अच्छे दिन कहाँ है? जे होते तेही चालले गेले. नोटाबंदीने कंबरडे मोडले. बेरोजगारी कमालीची वाढली. उन्नाव- कठुआसारख्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच. ज्यांच्यावर गंभीर आरोप होते, अशी मंडळी सरसकट सुटत आहे, ही चिंतेची बाब होय, असे आझमी यांनी नमूद केले.

भाजपला सशक्त पर्याय उभा झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण याबाबतीत काँग्रेस मनमानी करताना दिसत आहे. अखिलेश यादव यांना तर देशचे पंतप्रधान व्हायचे नाही. राहुल गांधी हेच दावेदार आहेत. त्यांनी खरे तर यात चांगला पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसची नीती चांगली आहे. पण आता नियत खराब होत चालली आहे. सॉफ्ट हिंदुत्ववाद त्यांनी स्वीकारणे योग्य वाटत नाही. अमरसिंग यांच्यामुळे समाजवादी पार्टीचे नुकसान झाले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ही व्यक्ती बरोबर नाही, अशी अनेक विधाने अबू आझमी यांनी यावेळी केली.

मकब-यात नमाज पढण्याची परवानगी द्या...बीबीका मकबरा येथे नमाज पढू द्यायला हवे, अशी भावना आज आझमी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मकब-यालाही भेट दिली. त्यांनी सांगितले की, मकब-यात ३७५ जण नमाज पढू शकतात. ही परवानगी मिळायला हवी’

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAurangabadऔरंगाबादAbu Azmiअबू आझमी