शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘एमआयएम देशासाठी धोका’- अबू आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:19 IST

‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला.

ठळक मुद्देएमआयएमचा माजी प्रदेशाध्यक्ष समाजवादी पार्टीत

औरंगाबाद : ‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. नांदेडहून हे कार्यकर्ते अनेक वाहनांनी औरंगाबादला पोहोचले होते.

सुभेदारी गेस्ट हाऊसवर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने झालेल्या पत्रपरिषदेत आझमी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नरेंद्र मोदी व भाजपच्या सध्याच्या वाटचालीवर त्यांनी सडकून टीका केली. कायदा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. जे भाजपबरोबर ते देशप्रेमी आणि जे नाहीत ते देशद्रोही, असे सध्या चालू आहे. नॉन इश्यूज् निर्माण करून हिंदू- मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला जात आहे. मुस्लिम आणि दलित समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. हे राष्ट्र हिंदूराष्ट्र होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे आझमी यांनी नमूद केले.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, अच्छे दिन कहाँ है? जे होते तेही चालले गेले. नोटाबंदीने कंबरडे मोडले. बेरोजगारी कमालीची वाढली. उन्नाव- कठुआसारख्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच. ज्यांच्यावर गंभीर आरोप होते, अशी मंडळी सरसकट सुटत आहे, ही चिंतेची बाब होय, असे आझमी यांनी नमूद केले.

भाजपला सशक्त पर्याय उभा झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण याबाबतीत काँग्रेस मनमानी करताना दिसत आहे. अखिलेश यादव यांना तर देशचे पंतप्रधान व्हायचे नाही. राहुल गांधी हेच दावेदार आहेत. त्यांनी खरे तर यात चांगला पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसची नीती चांगली आहे. पण आता नियत खराब होत चालली आहे. सॉफ्ट हिंदुत्ववाद त्यांनी स्वीकारणे योग्य वाटत नाही. अमरसिंग यांच्यामुळे समाजवादी पार्टीचे नुकसान झाले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ही व्यक्ती बरोबर नाही, अशी अनेक विधाने अबू आझमी यांनी यावेळी केली.

मकब-यात नमाज पढण्याची परवानगी द्या...बीबीका मकबरा येथे नमाज पढू द्यायला हवे, अशी भावना आज आझमी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मकब-यालाही भेट दिली. त्यांनी सांगितले की, मकब-यात ३७५ जण नमाज पढू शकतात. ही परवानगी मिळायला हवी’

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAurangabadऔरंगाबादAbu Azmiअबू आझमी