शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:53 IST

एमआयएमकडून एकतर्फी निर्णय जाहीर 

ठळक मुद्देविधानसभेसाठी आठच जागा देत असल्याचे कारणवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे.

औरंगाबाद :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) व वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती  संपुष्टात आली आहे. वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे सविस्तर पत्रच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धीस दिले. जागावाटपावरून बिनसल्याने  हा निर्णय घेतल्याचे जलील यांनी म्हटले आहे. मात्र, जलील यांचा  निर्णय मान्य नसून, आम्ही असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करू, असे वंचित आघाडीने म्हटले आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद मध्य व मुंबईत एका जागेवर त्यांना यश मिळाले. आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमने युती केली. राज्यात ४८ जागांवर युतीने उमेदवार उभे केले. युतीचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर, अकोला येथे झालाच नाही. उलट वंचितचा फायदा एमआयएमला झाला. औरंगाबादेत  इम्तियाज जलील वंचितच्या पाठिंब्यावर निवडून आले. तेव्हापासून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली. 

अलीकडेच पुण्यात प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांची विधानसभांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली; पण अंतिम निर्णय झाला नव्हता. नंतर चर्चेच्या दोन फेऱ्यांत वंचितने एमआयएमला आठ जागा देऊ केल्या. औरंगाबाद मध्यचाही यात समावेश नव्हता. आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. शुक्रवारी जलील यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रक काढून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.  दरम्यान, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा खा. जलील यांनी केली असली तरी असदुद्दीन ओवेसी जाहीर करीत नाही तोपर्यंत एमआयएम वंचितसोबतच असल्याचे वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे. 

...तोवर युती कायमवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. जोपर्यंत असदुद्दीन ओवेसी युती तुटल्याचे सांगत नाहीत, वा तसे पत्र देत नाहीत तोवर एमआयएमची युती आहे, असेच आम्ही मानतो, असे वंचित आघाडीने पत्रकाद्वारे म्हटले आहे. ओवेसी यांनी विधानसभेसाठी १७ जागांची यादी पाठविली होती. या १७ जागांबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ओवेसींकडून युती तुटल्याचा संदेश वा पत्रही मिळालेला नाही. त्यामुळे  युती आहे असेच आम्ही मानतो, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही वंचित आघाडीने जलील यांना महत्त्व न देण्याचेच ठरवले होते. आंबेडकर यांनी चर्चा फक्त ओवेसी यांच्याशी केली जाईल, असे म्हटले होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरImtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी