शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:53 IST

एमआयएमकडून एकतर्फी निर्णय जाहीर 

ठळक मुद्देविधानसभेसाठी आठच जागा देत असल्याचे कारणवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे.

औरंगाबाद :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) व वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती  संपुष्टात आली आहे. वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे सविस्तर पत्रच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धीस दिले. जागावाटपावरून बिनसल्याने  हा निर्णय घेतल्याचे जलील यांनी म्हटले आहे. मात्र, जलील यांचा  निर्णय मान्य नसून, आम्ही असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करू, असे वंचित आघाडीने म्हटले आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद मध्य व मुंबईत एका जागेवर त्यांना यश मिळाले. आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमने युती केली. राज्यात ४८ जागांवर युतीने उमेदवार उभे केले. युतीचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर, अकोला येथे झालाच नाही. उलट वंचितचा फायदा एमआयएमला झाला. औरंगाबादेत  इम्तियाज जलील वंचितच्या पाठिंब्यावर निवडून आले. तेव्हापासून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली. 

अलीकडेच पुण्यात प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांची विधानसभांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली; पण अंतिम निर्णय झाला नव्हता. नंतर चर्चेच्या दोन फेऱ्यांत वंचितने एमआयएमला आठ जागा देऊ केल्या. औरंगाबाद मध्यचाही यात समावेश नव्हता. आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. शुक्रवारी जलील यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रक काढून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.  दरम्यान, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा खा. जलील यांनी केली असली तरी असदुद्दीन ओवेसी जाहीर करीत नाही तोपर्यंत एमआयएम वंचितसोबतच असल्याचे वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे. 

...तोवर युती कायमवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. जोपर्यंत असदुद्दीन ओवेसी युती तुटल्याचे सांगत नाहीत, वा तसे पत्र देत नाहीत तोवर एमआयएमची युती आहे, असेच आम्ही मानतो, असे वंचित आघाडीने पत्रकाद्वारे म्हटले आहे. ओवेसी यांनी विधानसभेसाठी १७ जागांची यादी पाठविली होती. या १७ जागांबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ओवेसींकडून युती तुटल्याचा संदेश वा पत्रही मिळालेला नाही. त्यामुळे  युती आहे असेच आम्ही मानतो, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही वंचित आघाडीने जलील यांना महत्त्व न देण्याचेच ठरवले होते. आंबेडकर यांनी चर्चा फक्त ओवेसी यांच्याशी केली जाईल, असे म्हटले होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरImtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी