शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:53 IST

एमआयएमकडून एकतर्फी निर्णय जाहीर 

ठळक मुद्देविधानसभेसाठी आठच जागा देत असल्याचे कारणवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे.

औरंगाबाद :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) व वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती  संपुष्टात आली आहे. वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देत असल्याचे सविस्तर पत्रच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धीस दिले. जागावाटपावरून बिनसल्याने  हा निर्णय घेतल्याचे जलील यांनी म्हटले आहे. मात्र, जलील यांचा  निर्णय मान्य नसून, आम्ही असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करू, असे वंचित आघाडीने म्हटले आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद मध्य व मुंबईत एका जागेवर त्यांना यश मिळाले. आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमने युती केली. राज्यात ४८ जागांवर युतीने उमेदवार उभे केले. युतीचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर, अकोला येथे झालाच नाही. उलट वंचितचा फायदा एमआयएमला झाला. औरंगाबादेत  इम्तियाज जलील वंचितच्या पाठिंब्यावर निवडून आले. तेव्हापासून दोन्ही पक्षांत सुंदोपसुंदी सुरू झाली. 

अलीकडेच पुण्यात प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांची विधानसभांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली; पण अंतिम निर्णय झाला नव्हता. नंतर चर्चेच्या दोन फेऱ्यांत वंचितने एमआयएमला आठ जागा देऊ केल्या. औरंगाबाद मध्यचाही यात समावेश नव्हता. आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. शुक्रवारी जलील यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत असल्याचे पत्रक काढून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.  दरम्यान, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा खा. जलील यांनी केली असली तरी असदुद्दीन ओवेसी जाहीर करीत नाही तोपर्यंत एमआयएम वंचितसोबतच असल्याचे वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे. 

...तोवर युती कायमवंचितने खा. जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. जोपर्यंत असदुद्दीन ओवेसी युती तुटल्याचे सांगत नाहीत, वा तसे पत्र देत नाहीत तोवर एमआयएमची युती आहे, असेच आम्ही मानतो, असे वंचित आघाडीने पत्रकाद्वारे म्हटले आहे. ओवेसी यांनी विधानसभेसाठी १७ जागांची यादी पाठविली होती. या १७ जागांबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ओवेसींकडून युती तुटल्याचा संदेश वा पत्रही मिळालेला नाही. त्यामुळे  युती आहे असेच आम्ही मानतो, असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही वंचित आघाडीने जलील यांना महत्त्व न देण्याचेच ठरवले होते. आंबेडकर यांनी चर्चा फक्त ओवेसी यांच्याशी केली जाईल, असे म्हटले होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरImtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी