शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

धक्कादायक ! अजिंठा डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:14 AM

अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली.

ठळक मुद्देसोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत.महिनाभरापासून या वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही.

सोयगाव ( औरंगाबाद ) : अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. वाढत्या उन्हामुळे जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, धरण परिसरही कोरडाठाक झाल्याने पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सोयगाव वनक्षेत्रात घनदाट झाडी असल्याने या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही पाहुणे पक्षीही अजिंठा डोंगरात वास्तव्यास आहेत; परंतु महिनाभरापासून उन्हाचे चटके वाढल्याने जंगलात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शेत शिवारातील विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. पिण्यासाठी पाणीच नसल्याने काही पक्ष्यांनी झाडावरील घरट्यातच जीव सोडल्याची दुर्दैवी घटना यातून आज उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत वन विभाग या घटनेबाबत अनभिज्ञ होता. त्यामुळे पशुप्रेमींमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. झाडाखाली मृत पक्ष्यांचा सडाच आढळला. काही पक्षी घरट्यातच मृत झालेले दिसले. धीवर, चिमण्या, कावळे, बगळे, तुतारी, सुगरण, कबुतर आदी विविध पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असताना वनविभाग मात्र डोळे झाकून आहे. वाढते ऊन व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे अजिंठ्याच्या डोंगररांगांतील पक्ष्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पाणवठे कोरडेठाक, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीलासोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत. महिनाभरापासून या वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बिबट्या, मोर, हरीण, नीलगाय व पक्ष्यांच्या घशाची कोरड अद्यापही दूर झालेली नाही. जंगलात पाणीच नसल्याने वानराच्या टोळ्याही गाव शिवारात येत आहेत. गावात साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वानरांच्या टोळ्यांनी गावात धुमाकूळ सुरूकेला आहे. हरीण, मोरांनी शेत शिवारात वास्तव्य केले आहे. पाण्याअभावी वन्य प्राणी गोंधळात पडले असून, त्यांच्या जिवाची घालमेल होत आहे. उन्हाची तीव्रता आणि पाण्याची दुर्मिळता वन्य प्राण्यांकडून सोसवत नसल्याचे या घटनेवरून लक्षात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातforestजंगलAjantha - Elloraअजंठा वेरूळ