शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अजिंठा डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 11:26 IST

अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली.

ठळक मुद्देसोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत.महिनाभरापासून या वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही.

सोयगाव ( औरंगाबाद ) : अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. वाढत्या उन्हामुळे जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, धरण परिसरही कोरडाठाक झाल्याने पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सोयगाव वनक्षेत्रात घनदाट झाडी असल्याने या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही पाहुणे पक्षीही अजिंठा डोंगरात वास्तव्यास आहेत; परंतु महिनाभरापासून उन्हाचे चटके वाढल्याने जंगलात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शेत शिवारातील विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. पिण्यासाठी पाणीच नसल्याने काही पक्ष्यांनी झाडावरील घरट्यातच जीव सोडल्याची दुर्दैवी घटना यातून आज उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत वन विभाग या घटनेबाबत अनभिज्ञ होता. त्यामुळे पशुप्रेमींमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. झाडाखाली मृत पक्ष्यांचा सडाच आढळला. काही पक्षी घरट्यातच मृत झालेले दिसले. धीवर, चिमण्या, कावळे, बगळे, तुतारी, सुगरण, कबुतर आदी विविध पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असताना वनविभाग मात्र डोळे झाकून आहे. वाढते ऊन व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे अजिंठ्याच्या डोंगररांगांतील पक्ष्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पाणवठे कोरडेठाक, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीलासोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत. महिनाभरापासून या वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बिबट्या, मोर, हरीण, नीलगाय व पक्ष्यांच्या घशाची कोरड अद्यापही दूर झालेली नाही. जंगलात पाणीच नसल्याने वानराच्या टोळ्याही गाव शिवारात येत आहेत. गावात साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वानरांच्या टोळ्यांनी गावात धुमाकूळ सुरूकेला आहे. हरीण, मोरांनी शेत शिवारात वास्तव्य केले आहे. पाण्याअभावी वन्य प्राणी गोंधळात पडले असून, त्यांच्या जिवाची घालमेल होत आहे. उन्हाची तीव्रता आणि पाण्याची दुर्मिळता वन्य प्राण्यांकडून सोसवत नसल्याचे या घटनेवरून लक्षात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातforestजंगलAjantha - Elloraअजंठा वेरूळ