शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:37 IST

Nana Patole News : आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

ठळक मुद्देनाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असतानाचा त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.

औरंगाबाद : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या विधानाने सुरु झाली आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही असे पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले. (  Home Minister Dilip Walse Patil on Nana Patole ) 

आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यापूर्वी ही नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे स्वबळ आणि मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. यामुळे पाळत ठेवण्याच्या त्यांच्या विधानाने महाविकास आघाडीत ठिणगी पडली असल्याची चर्चा सुरु झाल्या. पटोले यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे औरंगाबाद येथे आले असता त्यांना पत्रकार परिषदेत पटोले यांनी केलेल्या विधानावरून महाविकास आघाडीत धुसपूस सुरु आहे का ? असा  प्रश्न विचारण्यात आला. यावर वळसे पाटील यांनी, ' नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी कोणाकोणावर पाळत ठेवली आणि का ? यावर एक समिती नेमली आहे. त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.' असे उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना पटोले यांच्या विधानावर जास्त प्रतिक्रिया न देता सौम्य भूमिका घेतली असल्याचे संकेत मिळत आहेत. 

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या व्यक्तव्यावर प्रश्न विचारला होता. यावर 'नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला होता. यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांनी पटोले यांच्यावर जास्त न बोलता घेतलेली सौम्य भूमिका कदाचित त्यांना जास्त महत्व न देण्याबाबत असू शकते असा तर्क राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. दरम्यान, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला, असे स्प्ष्टीकरण दिले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNana Patoleनाना पटोले