शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:37 IST

Nana Patole News : आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

ठळक मुद्देनाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असतानाचा त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.

औरंगाबाद : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या विधानाने सुरु झाली आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही असे पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले. (  Home Minister Dilip Walse Patil on Nana Patole ) 

आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यापूर्वी ही नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे स्वबळ आणि मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. यामुळे पाळत ठेवण्याच्या त्यांच्या विधानाने महाविकास आघाडीत ठिणगी पडली असल्याची चर्चा सुरु झाल्या. पटोले यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे औरंगाबाद येथे आले असता त्यांना पत्रकार परिषदेत पटोले यांनी केलेल्या विधानावरून महाविकास आघाडीत धुसपूस सुरु आहे का ? असा  प्रश्न विचारण्यात आला. यावर वळसे पाटील यांनी, ' नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी कोणाकोणावर पाळत ठेवली आणि का ? यावर एक समिती नेमली आहे. त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.' असे उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना पटोले यांच्या विधानावर जास्त प्रतिक्रिया न देता सौम्य भूमिका घेतली असल्याचे संकेत मिळत आहेत. 

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या व्यक्तव्यावर प्रश्न विचारला होता. यावर 'नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला होता. यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांनी पटोले यांच्यावर जास्त न बोलता घेतलेली सौम्य भूमिका कदाचित त्यांना जास्त महत्व न देण्याबाबत असू शकते असा तर्क राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. दरम्यान, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला, असे स्प्ष्टीकरण दिले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNana Patoleनाना पटोले