शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:25 IST

जिल्ह्यातील अनेक अधिग्रहित विहिरींनी गाठला तळ

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प कोरडेच आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला ९३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उपलब्ध पाण्याचे स्रोत कमी पडत आहेत. त्यामुळे यापुढे टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच अवलंबून राहाणार आहे. 

एप्रिल महिन्यात जवळपास टँकरचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयना विनंती करून नांदगाव तालुक्यातील गळमोडी प्रकल्प शंभर टक्के आरक्षित केला आहे. जिल्ह्यात तात्पुर्ती पूरक नळ योजना, विहिरींच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील गावांसाठी लागणारे सुमारे १००-११० टँकर भरले जाणार आहेत. फारोळ जलशुद्धीकरण केंद्राने टँकर भरण्यासाठी शनिवार, दि. २० एप्रिलपर्यंतचीच मुदत दिलेली असून, महापालिकेकडून आणखी काही दिवस टँकर भरण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींतून सध्या ४२८ टँकर भरले जातात. विहिरींमधील पाणी आटत चालल्यामुळे आगामी काळात तेथे भरण्यात येणाºया टँकरसाठी अन्य स्रोतांचा उपयोग करावा लागणार आहे. परिणामी, टँकर आणि पाण्याचे उद्भव यांच्यातील अंतर वाढल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, ग्रामीण नागरिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. यासाठी तालुकानिहाय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढील टंचाईच्या  काळात ‘एमआयडीसी’चेच पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवठा करावा लागणार आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडल्या जाणाºया आवर्तनामुळे गंगापूर तालुक्यातील ५०-६० गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यापुढे आणखी एक आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात जांभई जलशुद्धीकरण केंद्र आणि केळगाव धरणातून टँकर भरले जातात. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद