शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:25 IST

जिल्ह्यातील अनेक अधिग्रहित विहिरींनी गाठला तळ

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प कोरडेच आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला ९३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उपलब्ध पाण्याचे स्रोत कमी पडत आहेत. त्यामुळे यापुढे टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच अवलंबून राहाणार आहे. 

एप्रिल महिन्यात जवळपास टँकरचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयना विनंती करून नांदगाव तालुक्यातील गळमोडी प्रकल्प शंभर टक्के आरक्षित केला आहे. जिल्ह्यात तात्पुर्ती पूरक नळ योजना, विहिरींच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील गावांसाठी लागणारे सुमारे १००-११० टँकर भरले जाणार आहेत. फारोळ जलशुद्धीकरण केंद्राने टँकर भरण्यासाठी शनिवार, दि. २० एप्रिलपर्यंतचीच मुदत दिलेली असून, महापालिकेकडून आणखी काही दिवस टँकर भरण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींतून सध्या ४२८ टँकर भरले जातात. विहिरींमधील पाणी आटत चालल्यामुळे आगामी काळात तेथे भरण्यात येणाºया टँकरसाठी अन्य स्रोतांचा उपयोग करावा लागणार आहे. परिणामी, टँकर आणि पाण्याचे उद्भव यांच्यातील अंतर वाढल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, ग्रामीण नागरिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. यासाठी तालुकानिहाय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढील टंचाईच्या  काळात ‘एमआयडीसी’चेच पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवठा करावा लागणार आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडल्या जाणाºया आवर्तनामुळे गंगापूर तालुक्यातील ५०-६० गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यापुढे आणखी एक आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात जांभई जलशुद्धीकरण केंद्र आणि केळगाव धरणातून टँकर भरले जातात. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद