शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:25 IST

जिल्ह्यातील अनेक अधिग्रहित विहिरींनी गाठला तळ

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प कोरडेच आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला ९३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उपलब्ध पाण्याचे स्रोत कमी पडत आहेत. त्यामुळे यापुढे टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच अवलंबून राहाणार आहे. 

एप्रिल महिन्यात जवळपास टँकरचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयना विनंती करून नांदगाव तालुक्यातील गळमोडी प्रकल्प शंभर टक्के आरक्षित केला आहे. जिल्ह्यात तात्पुर्ती पूरक नळ योजना, विहिरींच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील गावांसाठी लागणारे सुमारे १००-११० टँकर भरले जाणार आहेत. फारोळ जलशुद्धीकरण केंद्राने टँकर भरण्यासाठी शनिवार, दि. २० एप्रिलपर्यंतचीच मुदत दिलेली असून, महापालिकेकडून आणखी काही दिवस टँकर भरण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींतून सध्या ४२८ टँकर भरले जातात. विहिरींमधील पाणी आटत चालल्यामुळे आगामी काळात तेथे भरण्यात येणाºया टँकरसाठी अन्य स्रोतांचा उपयोग करावा लागणार आहे. परिणामी, टँकर आणि पाण्याचे उद्भव यांच्यातील अंतर वाढल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, ग्रामीण नागरिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. यासाठी तालुकानिहाय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढील टंचाईच्या  काळात ‘एमआयडीसी’चेच पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवठा करावा लागणार आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडल्या जाणाºया आवर्तनामुळे गंगापूर तालुक्यातील ५०-६० गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यापुढे आणखी एक आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात जांभई जलशुद्धीकरण केंद्र आणि केळगाव धरणातून टँकर भरले जातात. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद