शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मराठवाड्यासाठीचे हवामान अभ्यास केंद्र कागदावरच; पाच वर्षांत कृत्रिम पावसासाठी ७५ कोटींचा झाला चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 20:11 IST

Meteorological study center for Marathwada News : २०१७ साली सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावरही ३० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता. म्हणजेच मागील पाच वर्षांत राज्यात तीन वेळा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते.

ठळक मुद्दे२०१५ व २०१९ मध्ये मराठवाड्यात केला होता प्रयोगएवढ्या खर्चात दोन रडार राज्यात बसविणे शक्य होते.

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील पाच वर्षांत दोन वेळा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला गेला. या प्रयोगावर २०१५ साली ३० कोटी तर २०१९ साली सुमारे ४५ कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला. या प्रयोगादरम्यान चिकलठाणा विमानतळावर कायमस्वरूपी हवामानाचे अभ्यास केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावदेखील कागदावरच राहिला. दोन वेळा प्रयोग करण्यात ७५ कोटींचा चुराडा शासनाने केला; परंतु मराठवाड्यातील असंतुलित हवामानाचा अभ्यास करण्यासाठी ४० ते ५० कोटींच्या किमतीचे एक्स बॅण्ड डॉप्लर रडार या विभागासाठी बसविले गेले नाही. ( spends  75 crore for artificial rain in five years in Marathwada ) 

२०१७ साली सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावरही ३० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता. म्हणजेच मागील पाच वर्षांत राज्यात तीन वेळा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. एवढ्या खर्चात दोन रडार राज्यात बसविणे शक्य होते. २०१५ मध्ये सरकारने ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीला ३ महिन्यांसाठी २०० तास उड्डाण करण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये दिले होते. कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे जनतेच्या डोळ्यांत निव्वळ धूूळफेक केल्याचा आरोप काही शास्त्रज्ञांनी केला होता. ३० कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सिडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. २०१९ साली कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ४५ कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला. दोन्ही वेळा विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलट्स, तंत्रज्ञांचा आवास, निवासाचा खर्च शासनाने केला होता. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात तातडीने एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यात यावे, अशा मागणीचे निवदेन हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी एप्रिल २०२१ मध्ये पंतप्रधानांना ई-मेलद्वारे पाठविले आहे.

अभ्यास केंद्राला मुहूर्त लागलाच नाहीमराठवाड्यातील पावसाच्या माहितीसाठी २०१७ पासून अभ्यास केंद्र कार्यान्वित होण्याची चर्चा होत आहे. आजवर त्याला मुहूर्त लागलेला नाही. अभ्यास केंद्रासाठी औरंगाबाद किंवा सोलापूर विमानतळ निवडण्यातच वेळ गेला. कृत्रिम पाऊस व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या विमानाच्या पार्किंगसाठी १५ हजार स्के.फूट.जागेची मागणी येथील विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. यानंतर मराठवाड्यासह तीन वेळा कृत्रिम पावसाचे प्रयोग राज्यात झाले. मात्र, अभ्यास केंद्र सुरू झाले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या विभागाने औरंगाबादेत जागा मागितली होती.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा