शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा निरोप सोहळा, शिक्षणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

नांदेड :भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात २१ मुलांना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविले आहे़

नांदेड :जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात २१ मुलांना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविले आहे़ बुधवारी माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांच्या निवासस्थानावरुन या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ समाजाच्या वतीने आतापर्यंत एकुण ५० विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे़ सध्या मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण छाया आहे़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात या शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले आहे़ याबाबत भारतीय जैन समाजाने पुढाकार घेत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली़ पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीवरुन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील १७० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आले़ त्यातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़ १ डिसेंबर रोजी ३१ विद्यार्थ्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते़ त्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्यात आणखी २१ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले़ यापूर्वी डॉ़अनिल पाटील हे विद्यार्थ्यांसोबत काळजीवाहक म्हणून गेले होते़ यावेळी गणेश आणि शिरभाते यांनी ही जबाबदारी स्विकारली़ पोकर्णा यांच्या निवासस्थानी या सर्व १९ विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ आपुलकीने यावेळी अनेकांनी त्यांची विचारपूस केली़ पोकर्णा परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना साहित्य भेट म्हणून देण्यात आले़ तर मुन्ना जैन यांच्या वतीने स्कुल बॅग किट देण्यात आली़ यावेळी कार्यक्रमाला माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा, आनंद जैन, डॉ़अनिल पाटील, नवल पोकर्णा, राजीव जैन, ऋषिकेश कोंडेकर, अजित मेहर, मनोज श्रीमाळ, महावीर लोहांडे, दीपक कोठारी, राम पाटील रातोळीकर, संजय कौडगे, अजय बिसेन, शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी यांची उपस्थिती होती़ इच्छुकांना चार दिवसांची मुदत पुणे येथे शिक्षणाला पाठविण्यासाठी विद्यार्थी संख्येची मर्यादा नसून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १७० पैकी आतापर्यंत ५७ कुटुंबातील विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे़ आणखी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास संघटना तयार असून त्यांनी येत्या चार दिवसात संपर्क साधावा असे आवाहन डॉ़अनिल पाटील यांनी केले आहे़ मुलींना व्हायचंय शिक्षिका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये १९ मुली तर ३१ मुलांचा समावेश आहे़ यातील मुलींनी शिक्षिका होण्याचा तर मुलांनी पीएसआय होण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले़ ही मुले शिक्षणासाठी पुण्यात बुधवारी पुण्याला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिनेश सुभाष जाधव, अजय सुभाष जाधव, मनिषा गौतम निवडंगे, श्रीकांत प्रकाश यमजलवाड, मनोज कैलास तिवडे, विकास दत्ता बोईनवाड, नामदेव प्रभाकर इंगोले, जनार्दन मधुकर कदम, दीपक विठ्ठल वसूरे, निशा सुदामराव हिंगमिरे, श्वेता शिवराज हिंगमिरे, शितल शिवाजी गुबरे, सत्यजित शिवाजी गुबरे, शैलेष शिवाजी गुबरे, प्रदीप किशनराव गुबरे, प्रतिक्षा किशनराव गुबरे, शिलवंत हिरामण तुळसे, आकाश साईनाथ तोटावाड, उमेश व्यंकटी सुर्यवंशी, अनिल किशन कागणे व सुनील किशन कागणे यांचा सहभाग आहे़