शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

एनएसयुआयच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ; मतदारांवर दबाव टाकण्याचा झाला प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:20 IST

मतदानाच्या दुसऱ्या टप्यात आज शहरातील मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबाद : एनएसयुआय अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या निवडणूक सुरु आहे. आज मतदानाच्या दुसऱ्या टप्यात शहरातील मतदान केंद्रावर काही जणांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी सध्या निवडणुका सुरु आहेत. यासाठी औरंगाबादमधून जिल्हाध्यक्ष सागर साळुंखे हे उमेदवार आहेत. आज मतदानाचा दुसरा टप्पा सुरु आहे, दुपारी मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु असताना अचानक काही जणांनी मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत हुसकावून लावले. काही वेळाने पोलिसांनी यात हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या सगळ्या गोंधळात काही विद्यार्थ्यांनी मतदान न करताच तेथून काढता पाय घेतला. 

गोंधळा मागे पुण्यातील उमेदवारविश्वजित कदम यांचा पुण्यातील एक कार्यकर्तासुद्धा या पदासाठी उभा आहे. या विभागात आमचे पारडे जड आहे यामुळे  कदम यांच्या पुण्यातील कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाला. त्यांनी मतदारांना हुसकावून लावण्यासाठी गुंडांचा वापर केला, असा आरोप साळुंखे यांनी केला. तसेच याप्रकरणाची सविस्तर तक्रार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल द्वारे करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसStudentविद्यार्थीElectionनिवडणूकPoliticsराजकारण