शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मिरची व्यापाऱ्याने एनआरआयला घातला ४७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:19 IST

मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने नोंदविला गुन्हा : व्यवसायात पैसे गुंतविल्यास दरमहा आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली दाखविले आमिष

औरंगाबाद : मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.मोहम्मद रफियोद्दीन मोहम्मद जैनू सालेहीन (रा. बारी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हिमायतबाग एन-१३, येथील रहिवासी मोहंमद खलीलउल्ला सिद्दीकी गुलाम हे अनिवासी भारतीय आहेत. ते नोकरीनिमित्त ओमान देशात राहतात. त्यांचे किलेअर्क येथेही घर आहे. ते तीन ते चार महिन्यांतून एकदा औरंगाबादेत येतात आणि काही दिवसांनंतर परत ओमानला जातात. २०१५ मध्ये त्यांची एका मित्राकडून आरोपी रफियोद्दीनसोबत भेट झाली. त्यावेळी त्याने तो गावाबाहेरील मार्केटमधून मिरची खरेदी करून उदयपूर, अहमदनगर, सांगली येथे विक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या व्यवसायात वार्षिक ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, असे त्याने सांगितले. तुम्ही पैसे गुंतविल्यास लाखाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिमहिना रक्कम मिळेल, असे तो म्हणाला. खलीलउल्ला यांनी जानेवारी २०१५ मध्ये त्याला ३ लाख २५ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर दोन महिन्याचा मोबदला म्हणून ६ हजार रुपये आरोपीने त्यांना दिले. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी ४ लाख ३० हजार रुपये, १५ मार्च २०१६ रोजी दोन लाख रुपये रोखीने तर ६ मे २०१६ रोजी धनादेशद्वारे ३४ लाख ५५ हजार रुपये दिले. शारजा येथे असताना त्यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे रफियोद्दीनच्या बँक खात्यात ३ लाख ६२ हजार ६४७ रुपये असे एकूण ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपये दिले. त्याला तीन वेळा पैसे मिळाल्याचे रफियोद्दीनने डायरीवर लिहून दिल्याचे खलीलउल्ला यांनी तक्रारीत नमूद केले. गुंतविलेल्या रकमेवर आरोपीने खलीलउल्ला यांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत काही प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर मात्र मार्केट डाऊन आहे. व्यापाºयांकडून पैसे आले नाही, जीएसटीचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशी विविध कारणे सांगून पैसे देणे बंद केले. गुंतवणूक केलेली रक्कम खलीलउल्ला यांनी परत मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच खलीलउल्ला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली.मिरची व्यापाºयाचा आणखी एकाला १९ लाखांचा गंडाखलीलउल्ला यांच्याप्रमाणेच त्यांचे मित्र कलीमउल्लाह खान इब्राहिम खान (रा.रोहिल्ला गल्ली) यांचीही आरोपी रफियोद्दीनने १९ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, पोहेकॉ. अरुण वाघ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी