शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मिरची व्यापाऱ्याने एनआरआयला घातला ४७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:19 IST

मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने नोंदविला गुन्हा : व्यवसायात पैसे गुंतविल्यास दरमहा आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली दाखविले आमिष

औरंगाबाद : मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.मोहम्मद रफियोद्दीन मोहम्मद जैनू सालेहीन (रा. बारी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हिमायतबाग एन-१३, येथील रहिवासी मोहंमद खलीलउल्ला सिद्दीकी गुलाम हे अनिवासी भारतीय आहेत. ते नोकरीनिमित्त ओमान देशात राहतात. त्यांचे किलेअर्क येथेही घर आहे. ते तीन ते चार महिन्यांतून एकदा औरंगाबादेत येतात आणि काही दिवसांनंतर परत ओमानला जातात. २०१५ मध्ये त्यांची एका मित्राकडून आरोपी रफियोद्दीनसोबत भेट झाली. त्यावेळी त्याने तो गावाबाहेरील मार्केटमधून मिरची खरेदी करून उदयपूर, अहमदनगर, सांगली येथे विक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या व्यवसायात वार्षिक ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, असे त्याने सांगितले. तुम्ही पैसे गुंतविल्यास लाखाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिमहिना रक्कम मिळेल, असे तो म्हणाला. खलीलउल्ला यांनी जानेवारी २०१५ मध्ये त्याला ३ लाख २५ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर दोन महिन्याचा मोबदला म्हणून ६ हजार रुपये आरोपीने त्यांना दिले. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी ४ लाख ३० हजार रुपये, १५ मार्च २०१६ रोजी दोन लाख रुपये रोखीने तर ६ मे २०१६ रोजी धनादेशद्वारे ३४ लाख ५५ हजार रुपये दिले. शारजा येथे असताना त्यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे रफियोद्दीनच्या बँक खात्यात ३ लाख ६२ हजार ६४७ रुपये असे एकूण ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपये दिले. त्याला तीन वेळा पैसे मिळाल्याचे रफियोद्दीनने डायरीवर लिहून दिल्याचे खलीलउल्ला यांनी तक्रारीत नमूद केले. गुंतविलेल्या रकमेवर आरोपीने खलीलउल्ला यांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत काही प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर मात्र मार्केट डाऊन आहे. व्यापाºयांकडून पैसे आले नाही, जीएसटीचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशी विविध कारणे सांगून पैसे देणे बंद केले. गुंतवणूक केलेली रक्कम खलीलउल्ला यांनी परत मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच खलीलउल्ला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली.मिरची व्यापाºयाचा आणखी एकाला १९ लाखांचा गंडाखलीलउल्ला यांच्याप्रमाणेच त्यांचे मित्र कलीमउल्लाह खान इब्राहिम खान (रा.रोहिल्ला गल्ली) यांचीही आरोपी रफियोद्दीनने १९ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, पोहेकॉ. अरुण वाघ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी