शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:33 IST

खाम नदीच्या पश्चिमी काठावरील विद्यमान गोलवाडीच्या शिवारात बादशहा औरंगजेबाचा दख्खणचा सुभेदार महाराजा करणसिंह चिरनिद्रा घेत आहेत. इतिहासाच्या या खाणाखुणा उपेक्षित आहेत. 

- प्रशांत तेलवाडकर

कर्णपुरा परिसर ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते बिकानेरचे महाराजा करणसिंह. इ.स.१६६९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आताच्या गोलवाडी परिसरात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तेथे छत्री उभारण्यात आली. शहराच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या छत्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या छत्रीचे माहात्म्य कोणालाच माहीत नाही. 

औरंगजेब बादशहाने बिकानेरचे महाराजा करणसिंह यांना दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमले होते. औरंगाबादेतील खाम नदीच्या पूर्वेस कर्णपुरा गाव वसवून  करणसिंह सैन्यासह तेथे राहत होते. तेथे त्यांनी ‘राजाचा महाल’ आणि ‘राणीचा महाल’म्हणून ओळखले जाणारे दोन महालही उभारले होते. या महालालगतच महाराजांनी आपले कुलदैवत (राठोड राजपुतांचे कुलदैवत) ‘श्री करणी देवी’चे मंदिर १६६० ला स्थापन केले. या देवीलाच भाविक  कुणी ‘तुळजाभवानी’ तर कुणी ‘कर्णपुरा देवी’ म्हणून ओळखतात.

महाराजा करणसिंहांचे सैनिक देवीचे दर्शन घेऊन, शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करीत असत. कर्णपुऱ्यातील सीमोल्लंघनाची ही परंपरा आजमितीपर्यंत सुरूआहे. मंदिराचे संस्थापक  महाराजा करणसिंहांचा जन्म १० जुलै १६१६ ला झाला होता. दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमणुकीनंतर त्यांनी कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पद्यपुरा (पदमपुरा) नावाची तीन गावे वसविली होती. जी आज औरंगाबाद शहरातील वसाहती म्हणून ओळखल्या जातात.

तत्कालीन इंग्रज सरकार आणि महाराजांच्या वारसांमध्ये करार होऊन ब्रिटिश सरकारने बिकानेर सीमेलगतची बाबलरास आणि रतनखेरा ही दोन गावे महाराजांच्या वारसांना देऊन त्याच्या बदल्यात कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पदमपुरा १९०४ साली ब्रिटिशांनी घेतले होते. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे २२ जून १६६९ पर्यंत महाराजा करणसिंह  कर्णपुऱ्यातच राहत होते. त्यावेळी ‘चुरू’चे  ठाकूर कुशलसिंह कर्णपुऱ्यातच होते. त्यांनीच करणसिंहाचा अंत्यविधी केला.

गोलवाडी परिसरात जेथे अंत्यविधी करण्यात आला त्याठिकाणी करणसिंह महाराजांचे स्मारक म्हणून दगडी छत्री बांधण्यात आली. सुमारे १५ फूट उंचीची ही गोलाकार छत्री आज एकटीच उभी आहे. या छत्रीच्या ओट्याचा काही भाग आता पडू लागला आहे. चारीबाजूने गवत वाढले आहे. रस्त्यापासून आत एका शेतात कोपऱ्यात ही छत्री असल्याने तेथपर्यंत सहजासहजी कुणी जात नसल्यामुळे ती अजून टिकून आहे. पुरातत्व विभागालाही या छत्रीची माहिती नसावी. कारण, शहरात व आसपासच्या परिसरात अशा राजा, महाराजांच्या अनेक छत्र्या आहेत. त्या  आता शेवटच्या घटका मोजत आहेत. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद