शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचे सुभेदार महाराजा करणसिंहाचे स्मारक दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:33 IST

खाम नदीच्या पश्चिमी काठावरील विद्यमान गोलवाडीच्या शिवारात बादशहा औरंगजेबाचा दख्खणचा सुभेदार महाराजा करणसिंह चिरनिद्रा घेत आहेत. इतिहासाच्या या खाणाखुणा उपेक्षित आहेत. 

- प्रशांत तेलवाडकर

कर्णपुरा परिसर ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते बिकानेरचे महाराजा करणसिंह. इ.स.१६६९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आताच्या गोलवाडी परिसरात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तेथे छत्री उभारण्यात आली. शहराच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या छत्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या छत्रीचे माहात्म्य कोणालाच माहीत नाही. 

औरंगजेब बादशहाने बिकानेरचे महाराजा करणसिंह यांना दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमले होते. औरंगाबादेतील खाम नदीच्या पूर्वेस कर्णपुरा गाव वसवून  करणसिंह सैन्यासह तेथे राहत होते. तेथे त्यांनी ‘राजाचा महाल’ आणि ‘राणीचा महाल’म्हणून ओळखले जाणारे दोन महालही उभारले होते. या महालालगतच महाराजांनी आपले कुलदैवत (राठोड राजपुतांचे कुलदैवत) ‘श्री करणी देवी’चे मंदिर १६६० ला स्थापन केले. या देवीलाच भाविक  कुणी ‘तुळजाभवानी’ तर कुणी ‘कर्णपुरा देवी’ म्हणून ओळखतात.

महाराजा करणसिंहांचे सैनिक देवीचे दर्शन घेऊन, शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करीत असत. कर्णपुऱ्यातील सीमोल्लंघनाची ही परंपरा आजमितीपर्यंत सुरूआहे. मंदिराचे संस्थापक  महाराजा करणसिंहांचा जन्म १० जुलै १६१६ ला झाला होता. दख्खनचे सेनाप्रमुख म्हणून नेमणुकीनंतर त्यांनी कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पद्यपुरा (पदमपुरा) नावाची तीन गावे वसविली होती. जी आज औरंगाबाद शहरातील वसाहती म्हणून ओळखल्या जातात.

तत्कालीन इंग्रज सरकार आणि महाराजांच्या वारसांमध्ये करार होऊन ब्रिटिश सरकारने बिकानेर सीमेलगतची बाबलरास आणि रतनखेरा ही दोन गावे महाराजांच्या वारसांना देऊन त्याच्या बदल्यात कर्णपुरा, केसरसिंहपुरा आणि पदमपुरा १९०४ साली ब्रिटिशांनी घेतले होते. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे २२ जून १६६९ पर्यंत महाराजा करणसिंह  कर्णपुऱ्यातच राहत होते. त्यावेळी ‘चुरू’चे  ठाकूर कुशलसिंह कर्णपुऱ्यातच होते. त्यांनीच करणसिंहाचा अंत्यविधी केला.

गोलवाडी परिसरात जेथे अंत्यविधी करण्यात आला त्याठिकाणी करणसिंह महाराजांचे स्मारक म्हणून दगडी छत्री बांधण्यात आली. सुमारे १५ फूट उंचीची ही गोलाकार छत्री आज एकटीच उभी आहे. या छत्रीच्या ओट्याचा काही भाग आता पडू लागला आहे. चारीबाजूने गवत वाढले आहे. रस्त्यापासून आत एका शेतात कोपऱ्यात ही छत्री असल्याने तेथपर्यंत सहजासहजी कुणी जात नसल्यामुळे ती अजून टिकून आहे. पुरातत्व विभागालाही या छत्रीची माहिती नसावी. कारण, शहरात व आसपासच्या परिसरात अशा राजा, महाराजांच्या अनेक छत्र्या आहेत. त्या  आता शेवटच्या घटका मोजत आहेत. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद