शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:15 IST

प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती.

- राम शिनगारेऔरंगाबाद : 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', या मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे पहिल्यांदा पाहिल्यावर प्रेमात पडतो. त्यानंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून ओळख होते. साहित्य, इतिहास आणि समाजिक चर्चेतून मैत्री समृद्ध होत जाते. त्यात भाषा, प्रांत आणि जातीच्या भिंती गळून पडतात. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते अन् आयुष्य सोबतच घालविण्याचा निर्णय होतो. प्रेमासाठी दुसऱ्या राज्याचे केडर स्वीकारले जाते. हा सर्व प्रवास आहे महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय आणि औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा.

२०११ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत दोघे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पोहोचले होते. २९ ऑगस्ट २०११ रोजी आस्तिक कुमार यांची मोक्षदा यांच्यासोबत पहिली भेट झाली. आस्तिक कुमार यांनी मोक्षदा यांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले. प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती. दुसरे विषय इतिहास आणि समाजशास्त्र. या दोन्ही विषयांतही काहीसे साम्य. त्यातील अनेक बाबींवर चर्चा होत होती. या चर्चेतून दोघांच्या आवडीनिवडी समजल्या. स्वभाव जाणून घेता आले.

सततच्या चर्चेतून दोघे एकमेकांच्या जवळ आले. यात तीन महिन्यांचा कालावधी कसा निघून गेला, हे कळलेच नाही. हा कालावधी संपल्यानंतर मोक्षदा या हैदराबाद येथे पोलीस प्रशिक्षणासाठी गेल्या. तेव्हा मोबाइलवर संभाषण होत होते. याच कालावधीत दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याविषयीची माहिती दोघांनी आई-वडिलांना दिली. तेव्हा दोघांचा विवाह आंतरजातीय, आंतरराज्य आणि आंतरभाषीय होता. काही प्रश्न उपस्थित झाले. त्या सर्व प्रश्नांना उत्तर 'प्रेम' हेच होते. दोघांचे आई-वडील शेवटी तयार झाले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर २८ एप्रिल २०१२ ला विवाहबद्ध झाले. आता या प्रेमाला एका मुलाच्या रूपाने पालवीही फुटली आहे.

राज्य शासनाची मोठी मदतमोक्षदा यांना गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र केडर मिळाले. त्यामुळे आस्तिककुमार यांनीही एकत्र राहता यावे, यासाठी महाराष्ट्राची निवड केली. त्यांची पहिली पोस्टिंग गडचिरोलीला झाली, तर मोक्षदांची नागपूरला. दुसरी पोस्टिंग नाशिकला, तर मोक्षदांची त्र्यंबकेश्वरला. दोघांची तिसरी पोस्टिंग जळगाव येथे झाली. त्यानंतर हे अकोला येथे झेडपी सीईओ, तर त्या वाशिमला एसपी. तेथून हे बीडला जिल्हाधिकारी झाले, तर त्या औरंगाबाद ग्रामीणला एसपी. बीडहून ते औरंगाबादेत मनपा आयुक्त झाले. त्या ग्रामीणहून औरंगाबाद लोहमार्गला एसपी बनल्या. राज्य शासनाने दोघांनाही सोबत किंवा लगतच्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली. त्यामुळे एकमेकांपासून खूप दूर जावे लागले नाही, असे पांडेय यांनी सांगितले.

सामंजस्य, विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर या त्रिसूत्रीवर दोघांचा विश्वास आहे. त्यातूनच वाटचाल करीत आलो आहोत. आगामी काळातही त्रिसूत्रीवरच वाटचाल असणार आहे.- आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAurangabadऔरंगाबाद