शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर

By सुमित डोळे | Updated: December 7, 2023 13:59 IST

वधू-वर येताच वरात निघाली ठाण्यात; मुली भेटत नाही विसाव्या वर्षीच मुलाला बोहल्यावर बसवले

छत्रपती संभाजीनगर : तीन मुली झाल्यानंतर वडील लहानपणीच सोडून गेले. घरी कायम अठराविश्वे दारिद्र्य. त्यामुळे धुणी-भांडे करणाऱ्या आईने १४ व्या वर्षीच मुलीचे लग्न ठरवले. तर समाजात मुली भेटत नाही म्हणून वराच्या आई-वडिलांनी विसाव्या वर्षीच मुलाला बोहल्यावर बसवले. दामिनी पथकाला ही बाब समजताच त्यांनी बुधवारी दुपारी १ वाजता पडेगाव परिसरात धाव घेत निघालेली लग्नाची वरात थेट ठाण्यात नेली.

पडेगाव परिसरात अल्पवयीन मुलगी व मुलाचा विवाह लावला जात असल्याची माहिती बुधवारी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह पडेगावच्या दिशेने धाव घेतली. परिसरात पाहणी केली असता एका चौकात मंडप आढळून आला. अंमलदार लता जाधव, संगीता परळकर, अमृता भोपळे, सुरेखा कुकलारे, मनीषा तायडे या साध्या वेशात वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी झाल्या. त्या नातेवाईक म्हणून मंडपात बसून राहिल्या. तरी वधू-वर आले नाही. अखेर, दोन तासांनी वधू-वर येताच दोघेही लहान असल्याची खात्री झाली. मिरधे, चाईल्ड हेल्पलाईनचे सचिन दौंड यांनी तत्काळ आत धाव घेतली.

वधू-वरांनी लग्नमंडपात प्रवेश करताच अचानक समोर आलेल्या पोलिसांना पाहून मंडपात एकच धांदल उडाली. काही नातेवाइकांनी लांब राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने परिस्थिती सावरली. वधू-वराला वय विचारले असता दोघेही घाबरल्याने त्यांना सांगता आले नाही. पोलिसांनी दोघांचे आधार कार्ड व शाळेची टीसीची मागणी केली. वधू-वरासह दोन्हीकडील कुटुंबाला छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासमोर हजर करण्यात आले. देशमाने यांनी चाैकशी केली. तेव्हा मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे समोर आले. नात्यातीलच असल्याने दोन्ही कुटुंब लग्नास तयार झाले. मात्र, हा बालविवाह असून कायद्याने गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले व पुढील कारवाईसाठी मुलीला बालकल्याण समितीकडे सोपवले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न