शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लाचलुचपतीचे सर्वाधिक सापळे मराठवाड्यात; औरंगाबाद अधीक्षकांचे नवनवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:39 IST

गेल्या वर्षभरात मराठवाड्यात २७४ जणांना लाचेच्या सापळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

खुशालचंद बाहेती औरंगाबाद : गेल्या वर्षभरात मराठवाड्यात २७४ जणांना लाचेच्या सापळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याशिवाय १५ जणांविरुद्ध अपसंपदा व अन्य भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेल्या व राज्यातील सर्वाधिक शासकीय-निमशासकीय कार्यालये व कर्मचारी संख्या असलेल्या मुंबई शहरात फक्त ४१ लाचेचे सापळे यशस्वी झाले.लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात इतर कोणत्याही विभागापेक्षा किमान ५ पट अधिकारी-कर्मचारी मुंबईत आहेत व खुद्द या विभागाचे प्रमुखही तेथेच आहेत. तरी मुंबईतील अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळे केले नाही याचा अर्थ मुंबईत लाचखोरी अत्यल्प असावी किंवा ला.लु.प्र. विभाग अकार्यक्षम.ला.लु.प्र. विभागाची मराठवाड्यानंतर सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रातील (१८७) व त्यानंतर नाशिक (१२५), नागपूर (१११) व अमरावती (१०६) यांचा क्रमांक लागतो. अमरावती परिक्षेत्रातील कारवाईत गतवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ६ % वाढ झाली आहे. यापूर्वी अमरावतीचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी थेट नांदेडमध्ये जाऊन जी. विजयकृष्ण यादव या आयपीएस अधिकाºयावर ३ लाखांचा सापळा यशस्वी केला. राज्याच्या अन्य भागातील सापळ्यांच्या तुलनेत मुंबई शहराचे प्रमाणपत्र चिंताजनक आहे.ला.लु. प्र. विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांनी काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. अरविंद चावरिया यांनी जुलैमध्ये पदभार घेतल्यानंतर सर्वात प्रथम विभागात अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त २२ पोलिसांना मूळ घटकात परत केले. नवीन कर्मचारी घेताना लेखी परीक्षा सुरू केली. त्यामुळे शिफारशीवरून खात्यात प्रवेश बंद झाला. सापळ्यासाठी तक्रारदाराने फोन केल्यानंतर त्यांना कार्यालयात बोलवण्याऐवजी ला.लु.प्र. विभागाचे अधिकारीच त्यांच्याकडे जातात व तेथून परस्पर सापळा लावला जातो.यामुळे तक्रारीची गोपनीयता भंग होत नाही व सापळा यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते, असे चावरिया यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराला ज्या कामासाठी लाच मागितली जात आहे ते काम कायदेशीर असेल तर ते करून देण्याची जबाबादारी ला.लु.प्र.वि. स्वीकारत आहे.औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व ला.लु.प्र. कार्यालयांत सीसीटीव्ही लावण्यात आले असून, कोणी तक्रारदार आला आहे काय व त्याला अधिकारी कसा प्रतिसाद देत आहेत, हे चावरिया सतत मोबाईलवर पाहत असतात.सध्या विभागासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा व्हॉईस रेकॉर्डिंगच्या तपासणीचा आहे. लाचेच्या मागणीचा आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत पाठवण्यात येतो. औरंगाबाद परिक्षेत्रातील ११७ सॅम्पल तपासणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे खटल्यांना विलंब होतो व शिक्षेचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू असल्याचे अरविंद चावरिया यांनी सांगितले.>कोणताही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी लाच मागत असेल, तर थेट मोबाइलवर संपर्क साधा. पूर्ण गोपनीयता ठेवली जाईल व कायदेशीर काम पूर्णही करून दिले जाईल.- अरविंद चावरिया,पोलीस अधीक्षक, एसीबी, औरंगाबाद परिक्षेत्र.