शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

लाचलुचपतीचे सर्वाधिक सापळे मराठवाड्यात; औरंगाबाद अधीक्षकांचे नवनवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 04:39 IST

गेल्या वर्षभरात मराठवाड्यात २७४ जणांना लाचेच्या सापळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

खुशालचंद बाहेती औरंगाबाद : गेल्या वर्षभरात मराठवाड्यात २७४ जणांना लाचेच्या सापळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याशिवाय १५ जणांविरुद्ध अपसंपदा व अन्य भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेल्या व राज्यातील सर्वाधिक शासकीय-निमशासकीय कार्यालये व कर्मचारी संख्या असलेल्या मुंबई शहरात फक्त ४१ लाचेचे सापळे यशस्वी झाले.लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात इतर कोणत्याही विभागापेक्षा किमान ५ पट अधिकारी-कर्मचारी मुंबईत आहेत व खुद्द या विभागाचे प्रमुखही तेथेच आहेत. तरी मुंबईतील अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळे केले नाही याचा अर्थ मुंबईत लाचखोरी अत्यल्प असावी किंवा ला.लु.प्र. विभाग अकार्यक्षम.ला.लु.प्र. विभागाची मराठवाड्यानंतर सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रातील (१८७) व त्यानंतर नाशिक (१२५), नागपूर (१११) व अमरावती (१०६) यांचा क्रमांक लागतो. अमरावती परिक्षेत्रातील कारवाईत गतवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ६ % वाढ झाली आहे. यापूर्वी अमरावतीचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी थेट नांदेडमध्ये जाऊन जी. विजयकृष्ण यादव या आयपीएस अधिकाºयावर ३ लाखांचा सापळा यशस्वी केला. राज्याच्या अन्य भागातील सापळ्यांच्या तुलनेत मुंबई शहराचे प्रमाणपत्र चिंताजनक आहे.ला.लु. प्र. विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांनी काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. अरविंद चावरिया यांनी जुलैमध्ये पदभार घेतल्यानंतर सर्वात प्रथम विभागात अनेक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त २२ पोलिसांना मूळ घटकात परत केले. नवीन कर्मचारी घेताना लेखी परीक्षा सुरू केली. त्यामुळे शिफारशीवरून खात्यात प्रवेश बंद झाला. सापळ्यासाठी तक्रारदाराने फोन केल्यानंतर त्यांना कार्यालयात बोलवण्याऐवजी ला.लु.प्र. विभागाचे अधिकारीच त्यांच्याकडे जातात व तेथून परस्पर सापळा लावला जातो.यामुळे तक्रारीची गोपनीयता भंग होत नाही व सापळा यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते, असे चावरिया यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराला ज्या कामासाठी लाच मागितली जात आहे ते काम कायदेशीर असेल तर ते करून देण्याची जबाबादारी ला.लु.प्र.वि. स्वीकारत आहे.औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व ला.लु.प्र. कार्यालयांत सीसीटीव्ही लावण्यात आले असून, कोणी तक्रारदार आला आहे काय व त्याला अधिकारी कसा प्रतिसाद देत आहेत, हे चावरिया सतत मोबाईलवर पाहत असतात.सध्या विभागासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा व्हॉईस रेकॉर्डिंगच्या तपासणीचा आहे. लाचेच्या मागणीचा आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत पाठवण्यात येतो. औरंगाबाद परिक्षेत्रातील ११७ सॅम्पल तपासणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे खटल्यांना विलंब होतो व शिक्षेचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढण्याचे प्रयत्न चालू असल्याचे अरविंद चावरिया यांनी सांगितले.>कोणताही सरकारी-निमसरकारी अधिकारी-कर्मचारी लाच मागत असेल, तर थेट मोबाइलवर संपर्क साधा. पूर्ण गोपनीयता ठेवली जाईल व कायदेशीर काम पूर्णही करून दिले जाईल.- अरविंद चावरिया,पोलीस अधीक्षक, एसीबी, औरंगाबाद परिक्षेत्र.