शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत; धरणांत केवळ ११.८७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:14 IST

अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. महिनाभरात ४ टक्क्यांनी पाणी घटले आहे. अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

एकीकडे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत अद्यापही पावसाला सुरुवात नाही. मराठवाड्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता आगामी कालावधीत दमदार पावसाची आवश्यकता आहे. गतवर्षी म्हणजे ११ जून २०१७ रोजी मराठवाड्यातील धरणांत १३.६० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा ११.८७ टक्के इतका आहे. दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सध्या जायकवाडीतील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे.

जायकवाडीमध्ये ५ जून रोजी १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा होता. ११ जून रोजी हाच पाणीसाठा १२४६.४२ (२३.४१) टक्क्यांवर आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होईल. जायकवाडीसह मराठवाड्यातील इतर जलप्रकल्पांचीही अशीच काहीशी अवस्था आहे. नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयात २९.८२ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही वर्षे हे धरण पाण्याने शंभर टक्के  भरून वाहिले. त्यामुळे टंचाई भासली नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली. सध्या मात्र या धरणात ८.२३ टक्के जलसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर सिंचनाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

अन्य जलप्रकल्पांतील पाणीसाठा निम्न दुधना प्रकल्पात १४०.८९ दलघमी (१५.८१ टक्के), येलदरी प्रकल्पात ११८.०७ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४१.१६ दलघमी, माजलगाव धरणात १५३.६० दलघमी (३.७२ टक्के), मांजरा धरणात ६२.०० दलघमी (८.२३ टक्के), निम्न मनार प्रकल्पात १४.९६ दलघमी (४.५२ टक्के), निम्न तेरणा प्रकल्पात ७२.३५ दलघमी (४६.४६ टक्के), विष्णुपुरी धरणात  २६.८५ दलघमी (२९.८२ टक्के), सिना कोळेगाव प्रकल्पात ७४.७० दलघमी (०.५३ टक्के) पाणी साठा आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDamधरण