शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत; धरणांत केवळ ११.८७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:14 IST

अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. महिनाभरात ४ टक्क्यांनी पाणी घटले आहे. अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

एकीकडे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत अद्यापही पावसाला सुरुवात नाही. मराठवाड्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता आगामी कालावधीत दमदार पावसाची आवश्यकता आहे. गतवर्षी म्हणजे ११ जून २०१७ रोजी मराठवाड्यातील धरणांत १३.६० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा ११.८७ टक्के इतका आहे. दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सध्या जायकवाडीतील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे.

जायकवाडीमध्ये ५ जून रोजी १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा होता. ११ जून रोजी हाच पाणीसाठा १२४६.४२ (२३.४१) टक्क्यांवर आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होईल. जायकवाडीसह मराठवाड्यातील इतर जलप्रकल्पांचीही अशीच काहीशी अवस्था आहे. नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयात २९.८२ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही वर्षे हे धरण पाण्याने शंभर टक्के  भरून वाहिले. त्यामुळे टंचाई भासली नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली. सध्या मात्र या धरणात ८.२३ टक्के जलसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर सिंचनाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

अन्य जलप्रकल्पांतील पाणीसाठा निम्न दुधना प्रकल्पात १४०.८९ दलघमी (१५.८१ टक्के), येलदरी प्रकल्पात ११८.०७ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४१.१६ दलघमी, माजलगाव धरणात १५३.६० दलघमी (३.७२ टक्के), मांजरा धरणात ६२.०० दलघमी (८.२३ टक्के), निम्न मनार प्रकल्पात १४.९६ दलघमी (४.५२ टक्के), निम्न तेरणा प्रकल्पात ७२.३५ दलघमी (४६.४६ टक्के), विष्णुपुरी धरणात  २६.८५ दलघमी (२९.८२ टक्के), सिना कोळेगाव प्रकल्पात ७४.७० दलघमी (०.५३ टक्के) पाणी साठा आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDamधरण