शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 19:54 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष: 

- डाॅ. शिरीष खेडगीकर

‘पंगतीमध्ये वाढपी ओळखीचा असेल तर जेवणाऱ्याला दोन-चार लाडू जास्त मिळतात, मराठवाड्याच्या ताटात आता विकासाचे पदार्थ पडतील’ असे मराठवाड्याचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आपल्या भाषणातून नेहमी सांगायचे; परंतु गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या लाडूची वाट पाहत पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही, अशी आज मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे.

संवैधानिक तरतुदीमुळे मराठवाड्याला माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत वैधानिक विकास मंडळ मिळाले. दुर्दैवाने आज त्याचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ४६ हजार ५७९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या ‘पॅकेज’चे काय झाले? गतवर्षी घोषित केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याचा पाठपुरावा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी करणे अपेक्षित आहे. ७६ वर्षांत मराठवाड्याला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर देताना दळणवळणाच्या सुविधा, चौपदरी महामार्ग इत्यादी गोष्टींमुळे काही प्रमाणात झालेली सोय वगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये मराठवाड्याला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. पूर्वी मला माझ्या गावी, अंबाजोगाईला जाण्यासाठी बसने आठ तास लागत. आता चारचाकीने मी चार तासांत तेथे जातो. तालुक्यांची गावे ‘बायपास’ झालीत; परंतु रस्त्यावर लागणाऱ्या खेड्यांमध्ये, तेथील लोकांमध्ये फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

ग्रामीण शाळांची गुणवत्ता, तेथील शैक्षणिक सुविधा, खेड्या-पाड्यांमधील आरोग्यविषयक सुविधा आदींची पाहणी केल्यानंतर निराशा होते. नदीजोड प्रकल्प आणि ‘वाॅटरग्रीड’सारख्या जलसिंचनाच्या योजना केवळ कागदावरच राहिल्या. रेल्वे आणि हवाई प्रवासाच्या सुविधा वाढल्या; परंतु पर्यटन क्षेत्राचा विकास झाला नाही. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या; परंतु आजही मराठवाड्यातील हजारो तरुण अभियंते नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा किंवा विदेशाचा रस्ता गाठतात. हे स्थलांतर कधी थांबणार?

इ.स. १७२४ पासून १९४८ पर्यंत जवळजवळ सव्वादोनशे वर्षे आणि त्यानंतरही १९५६ पर्यंत हैदराबाद हीच मराठवाड्याची राजधानी होती. मराठवाड्याचा अनुशेष काढताना पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाशी तुलना करणे आता उपयोगाचे नाही. हैदराबादचा तेथील डोळस राज्यकर्त्यांनी केलेला डोळे दिपवून टाकणारा औद्योगिक विकास मराठवाड्यातील जुन्या-जाणत्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून एकदा पाहावा आणि पंगतीत बसलेल्या मराठवाड्याच्या ताटात विकासाचे गोडधोड वाढावे, हीच आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शुभेच्छांसह अपेक्षा.

(लेखक छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा