शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कर्जमाफीचे १११६.४४ कोटी पडून; शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:02 IST

मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे.  

ठळक मुद्देऔरंगाबाद व लातूर येथील विभागीय कार्यालयातील माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे. याशिवाय १.५९ लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेले १११६.४४ कोटी रुपये अजुनही बँकांच्या खात्यात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे. 

औरंगाबाद व लातूर येथील विभागीय कार्यालयातून माजी साखर सहआयुक्त के. ई. हरदास यांनी मिळविलेल्या माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. 

औरंगाबादेत १३३ कोटी बँकांमध्ये पडूनऔरंगाबाद जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे १३३ कोटी रुपये बँकेत पडून आहेत. मात्र जिल्हा बँकेने ४ कोटी रु. शासनाला परत केलेले आहेत, असे दिसून येते.  

जालन्यात ३६५ कोटी पडूनजालना जिल्ह्याला ९६०.३७ कोटी रु. मंजूर झाले. पण शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात फक्त ५९५.३५ कोटी रु.जमा झाले आहेत. तसेच ३६५.०२ कोटी रु. पूर्ततेअभावी बँकेच्या खात्यात पडून आहेत. ही टक्केवारी ४० टक्के इतकी आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ७०.०४ कोटी शासनाला परत करण्याची घाई केली.  

हिंगोली : २३९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरहिंगोली जिल्ह्यात प्राप्त २६०.७२ कोटींपैकी २३९.४३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा दावा शासन व प्रशासनाकडून केला जात आहे. जिल्ह्यात ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६०.७२ कोटींची कर्जमाफी मंजूर झाली आहे.  २७८ शेतकऱ्यांचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. 

बीड : ७३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर बीड जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ८७० शेतकऱ्यांना ७३७.०७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.  

लातूर जिल्ह्यात ३७८ कोटींची कर्जमाफीलातूर जिल्ह्यासाठी ५१६ कोटी २४ लाख रुपये कर्जमाफीसाठी प्राप्त झाले असून, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५२ हजार ७४० आहे. मात्र त्यापैकी १ लाख ३९ हजार ७९४ शेतकऱ्यांना ३७८.८२ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार ९४७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. बहुदा हे शेतकरी वन टाईम सेटलमेंटच्या योजनेत येत असावेत, असा जिल्हा उपनिबंधकांचा अंदाज आहे. 

उस्मानाबाद : ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना लाभउस्मानाबाद जिल्ह्यातील ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे़ या शेतकऱ्यांचे २९६ कोटी ६९ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले आहे़ १२ हजार ८४६ लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेले सुमारे १३०.४४ कोटी रूपये बँकेच्या खात्यात पडून आहेत.  

नांदेड :  १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या अर्जावर निर्णय नाहीनांदेड जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०१ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यात आले आहे.  अर्ज भरलेल्या १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला  नाही. दुसर वनटाईम सेटलमेंट योजनेला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.  

परभणी : निम्म्या शेतकऱ्यांनाही मिळाला नाही लाभपरभणी जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे़ विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ३ लाख शेतकरी आहेत़ जिल्ह्यात एकूण सातबाराधारक शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ४७ हजार असून त्यापैकी १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ७४५ कोटी ७३ लाख रुपये जमा झाले आहेत़ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार