शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मराठवाडा कोरडाच; काही जिल्ह्यांत पावसाची तुरळक हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:02 IST

अनेक ठिकाणच्या पेरण्या रखडल्या 

ठळक मुद्देसर्वदूर पावसाची आवश्यकतानांदेड, परभणी हे दोन जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

हिंगोली/बीड/जालना/लातूर/उस्मानाबाद : मराठवाडा अजूनही कोरडाच असून सोमवारी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम  प्रकारचा पाऊस झाला. मराठवाड्यात अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पेरण्या रखडल्या आहेत. सोमवारी नांदेड, परभणी हे दोन जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी तुरळक पाऊस झाला. 

हिंगोली : जिल्ह्यात ८ जुलै रोजी काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात सकळापासूनच ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. हिंगोली शहरात सोमवारी सायंकाळी ६ वाजता जवळपास दोन तास दमदार सरी बरसल्या. तर नर्सी नामदेव, कनेरगाव नाका येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, पोत्रा परिसरातही चांगला पाऊस झाला. वसमत तालुक्यातील अडगाव रंजे, हट्टा, कौठा परिसरात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. सेनगाव शहरासह कडोळी येथे जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार, हट्टा  येथेही हलक्या सरी बरसल्या. तसेच सवना, बासंबा व कळमनुरी, नांदापूर या ठिकाणी पाऊस झाला. बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहे. 

जालना : शहरासह भोकरदन भोकरदन तालुक्यातील पारध व  परिसरात सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे  पसिरातील नदी -नाले ओथंबून वाहिले. दरम्यान पारध जवळील पद्मावती धरणाचा पाणीसाठा ९५ टक्यांपर्यंत पोहोचला होता. रात्री असाच पाऊस सुरू राहिल्यास हे धरण भरणार असल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले. अंबड तालुक्यातील शहागड परिसरातही सोमवारी दुपारी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. जालना शहरातही सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील धामणा धरणाच्या सांडव्यातून अद्यापही पाणी वाहत आहे. धरण फुटण्याची भीती मात्र, ओसरल्याचे सांगण्यात आले. 

लातूर : गेल्या आठ दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात हजेरी लावली़ रिमझिम झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली़ पावसाळा सुरू झाल्यापासून अद्याप एकदाही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला नाही़ त्यामुळे अजूनही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत़ केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ सोमवारी सायंकाळी शहरातील पाच नंबर चौक, हरंगुळ, वरवंटी, खाडगाव आदी भागात जवळपास तासभर पाऊस झाला़ उदगीर तालुक्यातील वाढवणा, सुकणी, उमरगा, किनी यल्लादेवी, येरोळ, आदी भागात रिमझिम पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीची चिंता लागली आहे़ 

उस्मानाबाद : जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही़ मात्र, मागील काही दिवसांपासून नियमित रिमझिम पाऊस सुरु झाला आहे़ तीन दिवसांपासून कधी दुपारी तर कधी सायंकाळी हलक्या सरी बरसत आहेत़ सोमवारीही दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहर व परिसरात हलक्या सरी बरसल्या़ याशिवाय, तडवळा, येडशी, तेर भागातही  रिमझिम पाऊस झाला़ 

बीड : यावर्षी म्हणावा तसा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. जिल्ह्यातील सर्व ६३ महसूल मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर अनेक ठिकाणच्या पेरण्या बाकी आहेत. ज्या ठिकाणी पेरणी व कापूस लागवड झाली आहे, त्या ठिकाणी येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. पावसाने दडी मारल्यामुळे चारा, पाण्याचे संकट कायम आहे. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती