शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणातही मराठवाडा कोरडाच;जायकवाडी वगळता बहुतांश धरणे मृतसाठ्यात, काही कोरडीठाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:41 IST

१०० मि.मी. पावसाची तूट 

ठळक मुद्दे२२ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

औरंगाबाद : श्रावण महिना शेवटच्या चरणात आहे, तरीही मराठवाडा अजून कोरडाच आहे. विभागात ९ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १०० मि.मी. पावसाची सध्या आवश्यकता असून, आजवर फक्त ३०२ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण ७७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४७६.८७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या गणनेनुसार सध्या पावसाळ्याचे ४१ दिवस शिल्लक आहेत. 

विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. जायकवाडीत ९१.६८ टक्के इतका जलसाठा सध्या शिल्लक आहे. त्यानंतर मनारमध्ये २४.३० टक्के, विष्णुपुरीमध्ये २१.८६ टक्के, तर पेनगंगामध्ये १४.८५ टक्के पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव, मांजरा, माजलगाव, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न दुधना हे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. विभागात ९२ टक्क्यांच्या आसपास खरीप हंगामात पेरणी झाली आहे. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी क्षेत्र ८ टक्क्यांनी वाढले. गेल्यावर्षी खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी ५0 टक्क्यांवर हंगामाचे उत्पादन घटले होते. दरम्यान, पुढील आठ दिवस विभागातील हवामान कोरडेच राहील, त्याचा परिणाम ढगाळ वातावरणावर होऊ शकतो, असे हवामानाचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. 

२२ लाख नागरिकांना टँकरचे पाणी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या विभागातील ९०६ गावे १५५ वाड्यांत राहणाऱ्या सुमारे २२ लाख ७१ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. उर्वरित पावसाळ्यात पाऊस झाला नाही, तर विभागातील काही जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. 

आजवर मराठवाड्यातील जिल्ह्यांत झालेला पाऊस जिल्हा    वार्षिक    टक्केवारीऔरंगाबाद    ४७.५३जालना    ३९.४४परभणी    ३५.७७हिंगोली    ४२.९९नांदेड    ४९.५८बीड    २४.३०लातूर    ३४.७६उस्मानाबाद    ३२.०६एकूण    ३८.७८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद