शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मराठवाड्यात ३४ टक्के पेरणी पूर्ण; नांदेड जिल्हा आघाडीवर तर उस्मानाबाद सर्वात मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:53 IST

खरिपाच्या पेरणीचा पहिला महिना संपत आला असून, मराठवाड्यात १६ लाख ५३ हजार २०० हेक्टर (३३.६६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ठळक मुद्दे यंदा सर्वाधिक ५९.१४ टक्के पेरणी सोयाबीनची  झाली तर कपाशीची ३७.१९ टक्के झाली आहे.    

औरंगाबाद : खरिपाच्या पेरणीचा पहिला महिना संपत आला असून, मराठवाड्यात १६ लाख ५३ हजार २०० हेक्टर (३३.६६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात ५३.६२ टक्के पेरणी करून नांदेड जिल्हा आघाडीवर असून सर्वात कमी २३.११ टक्के पेरणी उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. यंदा सर्वाधिक ५९.१४ टक्के पेरणी सोयाबीनची  झाली तर कपाशीची ३७.१९ टक्के झाली आहे.    

जोरदार सलामी देणारा पाऊस मध्यंतरी गायब झाला. यामुळे  पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा वरुणराजाचे आगमन झाल्याने पेरणीने जोर धरला आहे. मराठवाड्यात ४९,१०,९०० हेक्टरपैकी १६,५३,२०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीत नांदेड जिल्हा नंबर वन राहिला. हिंगोली जिल्ह्यात ५३.२२ टक्के, औरंगाबाद ३२.९२ टक्के, बीड २९.०० टक्के, परभणी २८.३४ टक्के, जालना २३.५८ टक्के, लातूर २३.७३ टक्के पेरणी पूर्ण झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात २३.११ टक्के पेरणी झाली. 

पेरणीमध्ये जालना, लातूर व उस्मानाबाद पिछाडले आहेत. १०,३८,८०० हेक्टरपैकी ६,१४,३०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यातही नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर  जिल्ह्यांत सोयाबीनची पेरणी अधिक आहे. तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात  ५१०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षी शेंद्री बोंडअळीच्या उद्रेकाने झालेले मोठे नुकसान लक्षात घेता यंदा शेतकरी कापूस कमी प्रमाणात लावतील, असा अंदाज कृषी विभागाने खरीप हंगाम बैठकीत व्यक्त केला होता. मात्र, नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडेच असल्याचे आतापर्यंतच्या पेरणीवरून दिसते आहे. मराठवाड्यात १७,१७,४०० हेक्टरपैकी ६,३८,७०० हेक्टरवर (३७.१९ टक्के) कपाशीची लागवड झाली आहे. त्यातही लातूर विभागात ३७.१९ टक्के तर औरंगाबाद विभागात ३२.३९ टक्के कापसाची लागवड झाली आहे. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी १०० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. 

ढगाळ वातावरण, तुरळक-मध्यम पाऊस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, मराठवाड्यात १ जुलैपर्यंत ढगाळ वातावरण राहील. काही भागात तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यास, जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पिकाची पेरणी करावी.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाagricultureशेती