शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे खरिपाचे ३५ % उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:35 IST

मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने एका अहवालानुसार विभागीय आयुक्तांकडे वर्तविली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत विभागातील पाऊस तसेच पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे. 

गेल्या वर्षी बोंडअळीमुळे खरिपाचे नुकसान झाले. यंदाही बोंडअळी आणि खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. विभागातील ७९९ मि. मी. पावसाच्या तुलनेत आजवर ४७२.५० मि. मी. इतका पाऊस झाला असून, पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडे गेले आहेत. हे अलीकडच्या तीन वर्षांतील सर्वाधिक खंड प्रमाण आहे. पावसाच्या खंडामुळे कापूस व मक्यासह इतर सर्व पिकांच्या उत्पादनाला ३० ते ३५ टक्के फटका बसणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.

गेल्या वर्षी कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले. परिणामी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला आहे. ज्यांनी यंदाही कापसाची लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे नुकसान येण्याची शक्यता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. १५ लाख हेक्टरवर यंदाच्या हंगामात कापसाची प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाअभावी आणि किडीमुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होणे शक्य आहे. कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे तुरीचे पीक वाढले असले तरी उत्पादनावर परिणाम होणे शक्य आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के  तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के  घट होईल. औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी खरीप हंगामातील उत्पादनावर पावसाअभावी परिणाम होणे शक्य असल्याचे सांगितले.

खरिपात ९ हजार कोटींची गुंतवणूक मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीच्या खर्चाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी