शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे खरिपाचे ३५ % उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:35 IST

मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने एका अहवालानुसार विभागीय आयुक्तांकडे वर्तविली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत विभागातील पाऊस तसेच पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे. 

गेल्या वर्षी बोंडअळीमुळे खरिपाचे नुकसान झाले. यंदाही बोंडअळी आणि खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. विभागातील ७९९ मि. मी. पावसाच्या तुलनेत आजवर ४७२.५० मि. मी. इतका पाऊस झाला असून, पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडे गेले आहेत. हे अलीकडच्या तीन वर्षांतील सर्वाधिक खंड प्रमाण आहे. पावसाच्या खंडामुळे कापूस व मक्यासह इतर सर्व पिकांच्या उत्पादनाला ३० ते ३५ टक्के फटका बसणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.

गेल्या वर्षी कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले. परिणामी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला आहे. ज्यांनी यंदाही कापसाची लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे नुकसान येण्याची शक्यता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. १५ लाख हेक्टरवर यंदाच्या हंगामात कापसाची प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाअभावी आणि किडीमुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होणे शक्य आहे. कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे तुरीचे पीक वाढले असले तरी उत्पादनावर परिणाम होणे शक्य आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के  तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के  घट होईल. औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी खरीप हंगामातील उत्पादनावर पावसाअभावी परिणाम होणे शक्य असल्याचे सांगितले.

खरिपात ९ हजार कोटींची गुंतवणूक मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीच्या खर्चाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी