शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे खरिपाचे ३५ % उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:35 IST

मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यात ६० टक्क्यांच्या आसपास पाऊस होऊनही खरीप हंगामाचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने एका अहवालानुसार विभागीय आयुक्तांकडे वर्तविली आहे. ३१ आॅगस्टपर्यंत विभागातील पाऊस तसेच पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिली आहे. 

गेल्या वर्षी बोंडअळीमुळे खरिपाचे नुकसान झाले. यंदाही बोंडअळी आणि खोड किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. विभागातील ७९९ मि. मी. पावसाच्या तुलनेत आजवर ४७२.५० मि. मी. इतका पाऊस झाला असून, पावसाळ्याच्या ९२ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडे गेले आहेत. हे अलीकडच्या तीन वर्षांतील सर्वाधिक खंड प्रमाण आहे. पावसाच्या खंडामुळे कापूस व मक्यासह इतर सर्व पिकांच्या उत्पादनाला ३० ते ३५ टक्के फटका बसणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. औरंगाबाद, बीड आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.

गेल्या वर्षी कापसाचे पीक बोंडअळीने पोखरले. परिणामी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचा पर्याय निवडला आहे. ज्यांनी यंदाही कापसाची लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरी बोंडअळीमुळे नुकसान येण्याची शक्यता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. १५ लाख हेक्टरवर यंदाच्या हंगामात कापसाची प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाअभावी आणि किडीमुळे कापूस उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होणे शक्य आहे. कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यातील पावसामुळे तुरीचे पीक वाढले असले तरी उत्पादनावर परिणाम होणे शक्य आहे. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के  तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के  घट होईल. औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी खरीप हंगामातील उत्पादनावर पावसाअभावी परिणाम होणे शक्य असल्याचे सांगितले.

खरिपात ९ हजार कोटींची गुंतवणूक मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीच्या खर्चाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी