शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पावसाअभावी मराठवाडयातील ९ हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:32 IST

मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुमारे ९ हजार कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या हंगामात केली होती. या हंगामाचे उत्पादन पावसाअभावी निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. पुढच्या १० दिवसांत खरीप हंगामाच्या आणेवारीबाबत निर्णय होण्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली. 

हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्चानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर पावसाअभावी पाणी फेरले गेले आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात ६३.६८ टक्के पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ५३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे. आता पाऊस झाला तरी त्याचा फायदा खरिपाला होणार नाही. 

कृषी खात्यानुसार विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर,  मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. आणेवारीनंतर या पिकांचे काय नुकसान झाले आहे, याची माहिती समोर येईल.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च - नांगरणीसाठी हेक्टरी खर्च -२,५०० रुपये - मोगडण्यासाठी - १,२५० रुपये- चरी पाडण्यासाठी - १,२५० रुपये- बियाणांची बॅग हेक्टरी सरासरी खर्च - ५ हजार रुपये- निंदणी करण्यासाठी  हेक्टरी खर्च - ३ हजार ७५० रुपये- १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या- शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा. - वखरण्यासाठी १,२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. -अंदाजे ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे.या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली, तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. एकरी कापूस लावण्यासाठी हजारो रुपयांचा चुराडा केला आहे, पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगाम संपुष्टात आला. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणाले...मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत जिल्हा समितीचे अहवाल येत आहेत. ते अहवाल आल्यानंतर शासनाच्या एका अध्यादेशाच्या अधीन राहून आणेवारीबाबत विचार होईल. येत्या १० दिवसांत आणेवारीबाबत निर्णय होईल, असे प्रभारी महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र