शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी मराठवाडयातील ९ हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:32 IST

मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुमारे ९ हजार कोटींची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या हंगामात केली होती. या हंगामाचे उत्पादन पावसाअभावी निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. पुढच्या १० दिवसांत खरीप हंगामाच्या आणेवारीबाबत निर्णय होण्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली. 

हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्चानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर पावसाअभावी पाणी फेरले गेले आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात ६३.६८ टक्के पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ५३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे. आता पाऊस झाला तरी त्याचा फायदा खरिपाला होणार नाही. 

कृषी खात्यानुसार विभागात मका २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर,  मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली. आणेवारीनंतर या पिकांचे काय नुकसान झाले आहे, याची माहिती समोर येईल.

१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्च - नांगरणीसाठी हेक्टरी खर्च -२,५०० रुपये - मोगडण्यासाठी - १,२५० रुपये- चरी पाडण्यासाठी - १,२५० रुपये- बियाणांची बॅग हेक्टरी सरासरी खर्च - ५ हजार रुपये- निंदणी करण्यासाठी  हेक्टरी खर्च - ३ हजार ७५० रुपये- १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या- शिवाय युरिया आणि फवारणीचा खर्च वेगळा. - वखरण्यासाठी १,२५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. -अंदाजे ४ वेळा शेतकऱ्यांनी वखरणी केली आहे.या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली, तर सरासरी १५ ते २० हजार रुपये हेक्टरी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. एकरी कापूस लावण्यासाठी हजारो रुपयांचा चुराडा केला आहे, पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगाम संपुष्टात आला. 

विभागीय महसूल उपायुक्त म्हणाले...मराठवाड्यातील खरीप हंगामाबाबत जिल्हा समितीचे अहवाल येत आहेत. ते अहवाल आल्यानंतर शासनाच्या एका अध्यादेशाच्या अधीन राहून आणेवारीबाबत विचार होईल. येत्या १० दिवसांत आणेवारीबाबत निर्णय होईल, असे प्रभारी महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र