शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

...तर मराठीही हिंदीची उपभाषा होईल; सुधीर रसाळ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:55 PM

मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांचे जपवणूक करणे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

ठळक मुद्देपरराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवावीहिंदी भाषेचे प्रादेशिक भाषेवर होत आहे आक्रमण

औरंगाबाद : भारतामध्ये कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा करण्याच्या पात्रतेची नाही. हिंदी भाषा बोलणारे अधिक आहेत, एवढा एकच मुद्दा आहे; पण तेवढ्यासाठी हिंदी राष्ट्रभाषा करून सर्वांवर लादावी हे लोकशाहीच्या विरोधात आहे. हिंदीचे मराठीवरचे आक्रमण असेच चालू राहिले, तर काही वर्षांनंतर मराठी भाषा स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल आणि भोजपुरीप्रमाणे हिंदीची एक उपभाषा होऊन जाईल, अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘मराठी वाचवा’ अभियानाबाबत मत व्यक्त केले.

नुकत्याच मांडलेल्या शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीची करावी या प्रस्तावाला विरोध केला. मराठी संवर्धनाविषयी बोलताना ते म्हणाले की, हिंदी भाषा ही आर्य कुळातल्या मराठी, गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांवर आक्रमण करत आहे. मराठी भाषा अलीकडच्या काळात हिंदीच्या संपर्कामुळे विकृत होत आहे. जेव्हा एकाच कुळातल्या दोन भाषा एकत्र येऊ लागतात, तेव्हा जर एका भाषेचे वर्चस्व स्वीकारले गेले तर आपोआपच दुसरी मूळ भाषा नष्ट होऊ लागते, हे सध्या मराठीच्या बाबतीत होऊ पाहत आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य या गोष्टींची जपवणूक करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. 

अमेरिकेत गेल्यावर प्रत्येक परभाषीय व्यक्तीला सर्वात आधी अमेरिकन इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जेव्हा परराज्यातून कोणी येते तेव्हा त्यांना आधी मराठी भाषा शिकवून मगच वर्गात प्रवेश दिला पाहिजे. महाराष्ट्रात तर शिक्षणाचे माध्यम हे मराठीच पाहिजे. शालेय पातळीवर मराठी हीच प्रमुख भाषा असली पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रात जर स्वत:चे स्वतंत्र बोर्ड आहे, तर मग इतर बोर्डांना येथे प्रवेश का द्यावा? या बोर्डांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणे, हे देखील मराठी मुलांवर अप्रत्यक्ष पद्धतीने अन्याय करणारेच आहे. 

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीMaharashtraमहाराष्ट्र