शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

चला, अचूक मराठी लिहूया!; तोडक्या व्याकरणामुळे वैभवशाली मराठीचा पाया कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:01 IST

Marathi Bhasha Din : मराठीची गोडी लावण्यासाठी प्राध्यापकाचा स्तुत्य उपक्रम

ठळक मुद्देआपण व्याकरणाच्या चुका करीत आहोत, हे कोणाच्या गावीही नसते. शाळेपासूनच मराठीचे व्याकरण दुर्लक्षित

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : इंग्रजाळलेले, हिंदीमिश्रित मराठी आजची पिढी सहज बोलते. बोलताना होणारी हिंदी-इंग्रजीची घुसळण मराठीच्या बोली भाषेतील सौंदर्य बिघडवते. मराठी बोलतानाच ही गत असून काना, उकार, मात्रा, वेलांटी यांची अचूक जागा मात्र मराठी लेखनातून हरवत चालली आहे. म्हणूनच, तर तोडक्या व्याकरणामुळे वैभवशाली मराठीचा पायाच कमकुवत होत असताना ‘चला, अचूक मराठी लिहू या! ’ असे म्हणत प्रा. नागेश अंकुश यांनी आजच्या विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे कनिष्ठ विभागात मराठी हा विषय शिकविणारे प्रा. नागेश याविषयी सांगताना म्हणाले की, मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय, गृहपाठ तपासताना असे लक्षात यायचे की, मुलांनी लिहिले तर अगदी नीटनेटके आहे; पण या नीटनेटकेपणातही व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत. आपण या चुका करीत आहोत, हे या मुलांच्या गावीही नसते. कारण मुलांना हस्ताक्षर छान काढा, स्वच्छ लिहा असे सांगितले जाते; पण मुले व्याकरणाच्या चुका टाळून अचूक लिहित आहेत की नाही, हे मात्र फार कमी शिक्षक काळजीपूर्वक तपासतात. 

शाळेपासूनच मराठीचे व्याकरण दुर्लक्षित राहिल्यामुळे मराठी विषय घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लिखाणातही अनेक चुका आढळून येतात. व्याकरण हे कोणत्याही भाषेचे खरे सौंदर्य असते. गौरवशाली परंपरा असणाऱ्या मराठीचा पायाच आणखी डळमळीत होऊ नये, म्हणून मराठीच्या व्याकरणाविषयी जनजागृती करण्यास आपण सुरुवात केली, असे त्यांनी नमूद केले. याकामी त्यांना भगवंत देशमुख, डॉ. दादा गोरे, डॉ. सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. यास्मिन शेख, रेणू दांडेकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, दासू वैद्य यांनी त्यांना प्रोत्साहनदिले. 

प्रा. नागेश म्हणाले की, महाविद्यालयीन स्तरावर कथा- कादंबरी अशा ललित प्रकारांच्या अंगाने मराठी शिकविले जाते; पण भाषेचा विकास म्हणून मुलांना मराठी शिकविण्यात आपण कमी पडतो आहोत. भाषेची जडणघडण, भाषा कशी तयार होते, हे शिकविले जात नाही. पाठ्यपुस्तकाच्या मागील नियमही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात नाही. सध्या इंग्रजी शाळांचा सुळसुळाट आहे. मुलांवर इंग्रजीचा भडिमार होताना मराठीची जी दुरवस्था सुरू आहे, ती थांबण्यास आता कुठेही वाव नाही, हे वारंवार जाणवते, अशी खंतही प्रा. नागेश यांनी व्यक्त केली. 

मराठीच्या व्याकरणासाठी प्रा. नागेश विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करतात. तसेच ‘चला अचूक मराठी लिहू या!’ या त्यांच्या दोन भागांच्या भित्तीपत्रकावरून सोप्या भाषेत मराठीच्या नियमांची संक्षिप्त माहिती त्यांनी दिली आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये संदर्भ म्हणून ही भित्तीपत्रके वापरण्यात येतात. याशिवाय काही अंध विद्यार्थ्यांच्या मदतीने ते मराठी व्याकरण ब्रेल लिपीमध्ये आणण्याचा प्रयत्नही करीत आहेत. 

मराठी वाचविण्यासाठी व्याकरण वाचवा साहित्याच्या दृष्टिकोनातून मराठीकडे पाहणे सोपे आहे; पण मराठीचे व्याकरण हे बौद्धिक कसरतीचे आणि वेळ घेणारे काम आहे. त्यामुळे मुलांचे व्याकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. स्पर्धा परीक्षेत मराठी विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हाच मुले मराठीच्या व्याकरणाकडे गांभीर्याने पाहतात. मराठी वाचविण्यासाठी व्याकरण वाचविणे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे गरजेचे आहे.   - प्रा. नागेश अंकुश

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनmarathiमराठीProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद