शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

शासनाच्या शिष्टमंडळाच्या भूमिकेवरच आंदोलनाची दिशा ठरणार; उपोषणकर्त्या राजश्री उंबरे

By बापू सोळुंके | Updated: September 14, 2024 16:55 IST

आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

छत्रपती संभाजीनगर: शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उद्या रविवारी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्यासाठी शासनाकडून लेखी आश्वासन काय मिळते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उंबरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ ला आपण राहणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. 

हैदराबाद संस्थानचे गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि शेतकरी,शेतमजूर ,कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, यामागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री उंबरे या २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात उपोषण करीत आहेत. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस होता. त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर आज शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहिर केली.

उमरे म्हणाल्या की, आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उद्या रविवारी मंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सरकारच्यावतीने भेटण्यासाठी येणार आहे. मागण्यासदंर्भात सरकार काय निर्णय घेते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उमरे यांनी नमूद केले.

संघटनेचे प्रवक्ता प्रवीण नागरे म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून ते आमच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक वाटले.परंतु धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, आता त्यांचे मंत्री तुमच्या मागण्या मान्य करतील असे वाटते का, या प्रश्नाचे उत्तर देताना  नागरे म्हणाले सरकार वेळकाढूपणा करतेय असे वाटते. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद