शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीच्या निर्णयाचा युतीला पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:51 IST

मदतीचे महापौरांसह महापालिका प्रशासनाला आता याचा विसर पडला. 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून चार जणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र, महापौरांसह महापालिका प्रशासनाला आता याचा विसर पडला. 

सोमवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन सभेतील निर्णयाची आठवण करून दिली. तीन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने पाण्यात उडी घेतली. या घटनेत शिंदे याचा मृत्यू झाला.  शहरातही प्रमोद हारे, उमेश शेळके, कारभारी शेळके यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. मनपा सत्ताधाऱ्यांनीही आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी चार दिवसांतच मदत घरपोच देणार असल्याचे जाहीर केले होते. आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सोमवारी काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेविका वैशाली साळवे, अनिता साळवे यांनी त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा