शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा एल्गार; क्रांतीचौकात चिंतन आंदोलनाला प्रारंभ

By बापू सोळुंके | Updated: February 23, 2025 15:40 IST

मराठा आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चासह मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चासह मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या सर्व संघटनांनी रविवारपासून क्रांतीचौकात चिंतन आंदोलन सुरू केले. ठोक माेर्चाचे रमेश केरे पाटील यांनी उपोषण सुरू केले. यांतर्गत मराठा आरक्षणासाठी सरकारने आजपर्यंत काढलेल्या जी.आर. आणि परिपत्रकांचे प्रदर्शन लावण्यात आले. शिवाय राेज सायंकाळी पीपीटीद्वारे मराठा समाज आरक्षणासाठी कसा पात्र आहे याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यावे, बार्टीप्रमाणे सारथीला सर्व सवलती देण्यात याव्यात, अण्णासाहेब  पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्यात यावा,  मराठा समाजाला ईडब्ल्यूएस  आरक्षण लागू करावे, आदी मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने  २३ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा इशारा आठ दिवसापूर्वी दिला होता. या इशाऱ्याची शासनाने दखल न घेतल्याने आजपासून क्रांतीचौकात प्रत्यक्ष आंदोलनाला सुरवात झाली.

एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,आदी घोषणा देत दुपारी १२ वाजता उपोषणाला सुरवात झाली. या आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष रमेश केरे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात समन्वयक राजेंद्र दाते पाटील, रवींद्र काळे पाटील, राहुल पाटील, शैलेश भिसे,नीलेश डव्हळे, सोमनाथ मगर, विजय ोगरे,गणेश थोरात,प्रदीप नवले,नितीन पाटील पाटील, मनीष जोगदंडे आदींनी सहभाग नोंदविला. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. राज्यसरकारने सन २०१९मध्ये मराठा समाजाला ईएसबीसी आरक्षण दिले होते. हे आरक्षण राज्य मागासवर्ग आयोग नेमून देण्यात आले होते. मात्र सरकारने कोर्टात योग्य बाजू न मांडल्याने ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. या निर्णयावर राज्यसरकारने क्युरेटीव पिटिशन दाखल केलेली आहे. हे आरक्षण टीकावे यासाठी चांगला वकील नेमून सरकारने ते आरक्षण टिकविणे आवश्यक आहे. राज्यसरकारने दिलेले एसईबीसी आरक्षण आज जरी लागू असले तरी ते एका समितीच्या शिफारसीवर देण्यात आले आहे. यामुळे हे आरक्षणही न्यायालयात टीकणार नाही, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण हवे आहे.- रमेश केरे पाटील, उपोषणकर्ते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर