शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळे अनेक भूभाग तणावग्रस्त: जयदेव रानडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:02 IST

तीन दिवसीय विवेकानंद महाविद्यालयाला सुरुवात: चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : चीनने जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा न लपवता उघडपणे काम सुरू केलेले आहे. त्याच्या या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळेच भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, अंदमान व निकोबार या भूभागासह जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आदी देशातील भूभागही तणावग्रस्त बनल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तथा भारत-चीन संबंधांचे भाष्यकार जयदेव रानडे यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेचे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी जयदेव रानडे यांनी "चिनी महत्त्वाकांक्षा : भारतीय व जागतिक संदर्भ" या विषयावर संवाद साधला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे आणि प्राचार्य डॉ.डी.आर. शेंगुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी रानडे म्हणाले, चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे. त्यांना अमेरिकेला पाठीमागे टाकून जगाचे नेतृत्व करायचे आहे. संपूर्ण जगाला दोन भागात आणि नेतृत्वात विभाजित करून चीन व अमेरिका या सशक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा लपून ठेवलेल्या नसल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेंगुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी मानले.

२०४९ पर्यंतचे केले नियोजनचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०२७ पर्यंत सैन्यदलाचे आधुनिकीकरण, २०३५ पर्यंत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात जागतिक आघाडी आणि २०४९ पर्यंत जगाला प्रभावित केले जाईल, अशा नेतृत्वाची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी नियोजन केले असल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले.

विश्वासार्हतेचा प्रचंड अभावभारताच्या चीनसोबत असलेल्या सीमेवर शांतता राहिली किंवा नाही, हे आता सांगताच येणार नाही. सध्या परिस्थिती कठीण आहे. चीनच्या विश्वासार्हतेमध्ये प्रचंड अभाव आहे. दोन्ही देश सध्या वर्चस्वासाठी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध हे भविष्यकाळात संकट आणि संघर्षांचेच असतील, असेही जयदेव रानडे यांनी स्पष्ट केले.

चिनी गृहितकात होतोय बदलचीनला आपण आतापर्यंत ओळखू शकलो नाहीत. त्यांची धोरणे आणि आक्रमकता ओळखून भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र ती न घेतल्यानंतर चीनने आपल्याविषयी 'भारत संयम बाळगेल किंवा माघार घेईल' असे गृहितकच बनवले होते. मात्र, सध्याच्या धोरणांमुळे हे गृहितक बदलत असल्याचेही रानडे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरchinaचीन