शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळे अनेक भूभाग तणावग्रस्त: जयदेव रानडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:02 IST

तीन दिवसीय विवेकानंद महाविद्यालयाला सुरुवात: चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : चीनने जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा न लपवता उघडपणे काम सुरू केलेले आहे. त्याच्या या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळेच भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, अंदमान व निकोबार या भूभागासह जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आदी देशातील भूभागही तणावग्रस्त बनल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तथा भारत-चीन संबंधांचे भाष्यकार जयदेव रानडे यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेचे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी जयदेव रानडे यांनी "चिनी महत्त्वाकांक्षा : भारतीय व जागतिक संदर्भ" या विषयावर संवाद साधला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे आणि प्राचार्य डॉ.डी.आर. शेंगुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी रानडे म्हणाले, चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे. त्यांना अमेरिकेला पाठीमागे टाकून जगाचे नेतृत्व करायचे आहे. संपूर्ण जगाला दोन भागात आणि नेतृत्वात विभाजित करून चीन व अमेरिका या सशक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा लपून ठेवलेल्या नसल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेंगुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी मानले.

२०४९ पर्यंतचे केले नियोजनचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०२७ पर्यंत सैन्यदलाचे आधुनिकीकरण, २०३५ पर्यंत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात जागतिक आघाडी आणि २०४९ पर्यंत जगाला प्रभावित केले जाईल, अशा नेतृत्वाची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी नियोजन केले असल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले.

विश्वासार्हतेचा प्रचंड अभावभारताच्या चीनसोबत असलेल्या सीमेवर शांतता राहिली किंवा नाही, हे आता सांगताच येणार नाही. सध्या परिस्थिती कठीण आहे. चीनच्या विश्वासार्हतेमध्ये प्रचंड अभाव आहे. दोन्ही देश सध्या वर्चस्वासाठी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध हे भविष्यकाळात संकट आणि संघर्षांचेच असतील, असेही जयदेव रानडे यांनी स्पष्ट केले.

चिनी गृहितकात होतोय बदलचीनला आपण आतापर्यंत ओळखू शकलो नाहीत. त्यांची धोरणे आणि आक्रमकता ओळखून भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र ती न घेतल्यानंतर चीनने आपल्याविषयी 'भारत संयम बाळगेल किंवा माघार घेईल' असे गृहितकच बनवले होते. मात्र, सध्याच्या धोरणांमुळे हे गृहितक बदलत असल्याचेही रानडे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरchinaचीन