शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळे अनेक भूभाग तणावग्रस्त: जयदेव रानडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:02 IST

तीन दिवसीय विवेकानंद महाविद्यालयाला सुरुवात: चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : चीनने जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा न लपवता उघडपणे काम सुरू केलेले आहे. त्याच्या या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळेच भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, अंदमान व निकोबार या भूभागासह जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आदी देशातील भूभागही तणावग्रस्त बनल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तथा भारत-चीन संबंधांचे भाष्यकार जयदेव रानडे यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेचे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी जयदेव रानडे यांनी "चिनी महत्त्वाकांक्षा : भारतीय व जागतिक संदर्भ" या विषयावर संवाद साधला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे आणि प्राचार्य डॉ.डी.आर. शेंगुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी रानडे म्हणाले, चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे. त्यांना अमेरिकेला पाठीमागे टाकून जगाचे नेतृत्व करायचे आहे. संपूर्ण जगाला दोन भागात आणि नेतृत्वात विभाजित करून चीन व अमेरिका या सशक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा लपून ठेवलेल्या नसल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेंगुळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी मानले.

२०४९ पर्यंतचे केले नियोजनचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०२७ पर्यंत सैन्यदलाचे आधुनिकीकरण, २०३५ पर्यंत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात जागतिक आघाडी आणि २०४९ पर्यंत जगाला प्रभावित केले जाईल, अशा नेतृत्वाची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी नियोजन केले असल्याचेही जयदेव रानडे यांनी सांगितले.

विश्वासार्हतेचा प्रचंड अभावभारताच्या चीनसोबत असलेल्या सीमेवर शांतता राहिली किंवा नाही, हे आता सांगताच येणार नाही. सध्या परिस्थिती कठीण आहे. चीनच्या विश्वासार्हतेमध्ये प्रचंड अभाव आहे. दोन्ही देश सध्या वर्चस्वासाठी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध हे भविष्यकाळात संकट आणि संघर्षांचेच असतील, असेही जयदेव रानडे यांनी स्पष्ट केले.

चिनी गृहितकात होतोय बदलचीनला आपण आतापर्यंत ओळखू शकलो नाहीत. त्यांची धोरणे आणि आक्रमकता ओळखून भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र ती न घेतल्यानंतर चीनने आपल्याविषयी 'भारत संयम बाळगेल किंवा माघार घेईल' असे गृहितकच बनवले होते. मात्र, सध्याच्या धोरणांमुळे हे गृहितक बदलत असल्याचेही रानडे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरchinaचीन