शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

भारताच्या तुलनेत अनेक देशांत पोटातील डायलिसिस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:05 IST

भारतातील रुग्णांसाठी ही सेवा विनामूल्य मिळण्यासाठी शासनाकडून प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

ठळक मुद्देडायलिसिस तज्ज्ञांच्या तीन दिवसीय परिषदेला प्रारंभभारतातील ग्रामीण भागांतील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी पोटातील डायलिसिस वरदान आहे जगभरातील अनेक देशांतील शासन पोटातील डायलिसिसला प्राधान्य देते.

औरंगाबाद : हिमोडायलिसिसची सुविधा नसणाऱ्या भारतातील ग्रामीण भागांतील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी पोटातील डायलिसिस वरदान आहे; परंतु त्यासाठीचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो. जगभरातील अनेक देशांतील शासन पोटातील डायलिसिसला प्राधान्य देते. त्यामुळे तेथे त्याचे प्रमाण अधिक आहे. भारतातील रुग्णांसाठी ही सेवा विनामूल्य मिळण्यासाठी शासनाकडून प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

पेरिटोनियल डायलिसिस सोसायटी आॅफ इंडियातर्फे शहरात आयोजित तीन दिवसीय डायलिसिस तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. रजनीश मेहरोत्रा, लखनौयेथील डॉ. अमित गुप्ता, डॉ. राजेश्वर चक्रवर्ती, डॉ. के. अबिरामी, डॉ. सुहास बावीकर, डॉ. समीर महाजन, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. शेखर शिराढोणकर, डॉ. प्रशांत पारगावकर, डॉ. सचिन सोनी, डॉ. उल्हास कोंडपल्ले,  डॉ. तरुण जलोका, डॉ. बालसुब्रह्मण्यम, डॉ. अमित गुप्ता, डॉ. नारायण प्रसाद, डॉ. किरण एन. कुमार आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मेहरोत्रा म्हणाले, अनेक देशांमध्ये घरच्या घरी करता येणाऱ्या पोटातील डायलिसिसचे (पेरिटोनियल) प्रमाण अधिक आहे. हे तेथील सरकारच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. प्रत्येक मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना पहिली तीन वर्षे हे डायलिसिस केले, तर अधिक परिणाम आणि फायदेशीर ठरू शकते. डॉ. अमित गुप्ता यांनी पोटातील डायलिसिसिला प्राधान्य का द्यावे, यावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रात डॉ. राजेश्वर चक्रवर्ती यांनी संशोधनानुसार हिमोडायलिसिस रुग्णांसाठी मैत्रीपूर्ण नसल्याचे नमूद केले. पोटातील डायलिसिस हे हृदयमित्र आहे, तर डॉ. के. अबिरामी यांनी हिमोडायलिसिस हे हृदयासाठी योग्य असल्याचे म्हटले. डॉ. किरण एन. कुमार यांनी डायलिसिसमधील अडचणींवर मार्गदर्शन केले.

साडेपाच वर्षांत ७५० डायलिसिसडॉ. सुहास बावीकर म्हणाले, २१ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत एका रुग्णाला साडेपाच वर्षांत ७५० वेळा डायलिसिस करावे लागल्याचे पाहिले. अनेक जण डायलिसिस जाणूनबुजून टाळतात. डायलिसिसदरम्यान स्वच्छतेसह अनेक जण काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम होतो. पोटातील डायलिसिस पद्धतीचा आयुष्यमान भारत कॅशलेश सेवेत समावेश झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

हरिभाऊ बागडेंचे मार्गदर्शनतीन दिवसीय परिषदेचे शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे