शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
8
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
10
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
17
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
18
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
19
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या तुलनेत अनेक देशांत पोटातील डायलिसिस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:05 IST

भारतातील रुग्णांसाठी ही सेवा विनामूल्य मिळण्यासाठी शासनाकडून प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

ठळक मुद्देडायलिसिस तज्ज्ञांच्या तीन दिवसीय परिषदेला प्रारंभभारतातील ग्रामीण भागांतील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी पोटातील डायलिसिस वरदान आहे जगभरातील अनेक देशांतील शासन पोटातील डायलिसिसला प्राधान्य देते.

औरंगाबाद : हिमोडायलिसिसची सुविधा नसणाऱ्या भारतातील ग्रामीण भागांतील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी पोटातील डायलिसिस वरदान आहे; परंतु त्यासाठीचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो. जगभरातील अनेक देशांतील शासन पोटातील डायलिसिसला प्राधान्य देते. त्यामुळे तेथे त्याचे प्रमाण अधिक आहे. भारतातील रुग्णांसाठी ही सेवा विनामूल्य मिळण्यासाठी शासनाकडून प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

पेरिटोनियल डायलिसिस सोसायटी आॅफ इंडियातर्फे शहरात आयोजित तीन दिवसीय डायलिसिस तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. रजनीश मेहरोत्रा, लखनौयेथील डॉ. अमित गुप्ता, डॉ. राजेश्वर चक्रवर्ती, डॉ. के. अबिरामी, डॉ. सुहास बावीकर, डॉ. समीर महाजन, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. शेखर शिराढोणकर, डॉ. प्रशांत पारगावकर, डॉ. सचिन सोनी, डॉ. उल्हास कोंडपल्ले,  डॉ. तरुण जलोका, डॉ. बालसुब्रह्मण्यम, डॉ. अमित गुप्ता, डॉ. नारायण प्रसाद, डॉ. किरण एन. कुमार आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मेहरोत्रा म्हणाले, अनेक देशांमध्ये घरच्या घरी करता येणाऱ्या पोटातील डायलिसिसचे (पेरिटोनियल) प्रमाण अधिक आहे. हे तेथील सरकारच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. प्रत्येक मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना पहिली तीन वर्षे हे डायलिसिस केले, तर अधिक परिणाम आणि फायदेशीर ठरू शकते. डॉ. अमित गुप्ता यांनी पोटातील डायलिसिसिला प्राधान्य का द्यावे, यावर मार्गदर्शन केले. चर्चासत्रात डॉ. राजेश्वर चक्रवर्ती यांनी संशोधनानुसार हिमोडायलिसिस रुग्णांसाठी मैत्रीपूर्ण नसल्याचे नमूद केले. पोटातील डायलिसिस हे हृदयमित्र आहे, तर डॉ. के. अबिरामी यांनी हिमोडायलिसिस हे हृदयासाठी योग्य असल्याचे म्हटले. डॉ. किरण एन. कुमार यांनी डायलिसिसमधील अडचणींवर मार्गदर्शन केले.

साडेपाच वर्षांत ७५० डायलिसिसडॉ. सुहास बावीकर म्हणाले, २१ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत एका रुग्णाला साडेपाच वर्षांत ७५० वेळा डायलिसिस करावे लागल्याचे पाहिले. अनेक जण डायलिसिस जाणूनबुजून टाळतात. डायलिसिसदरम्यान स्वच्छतेसह अनेक जण काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम होतो. पोटातील डायलिसिस पद्धतीचा आयुष्यमान भारत कॅशलेश सेवेत समावेश झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

हरिभाऊ बागडेंचे मार्गदर्शनतीन दिवसीय परिषदेचे शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद््घाटन झाले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे