शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार"; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:31 IST

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडोण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणासाठी आता लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे. 

Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

 मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आज ते बीड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "बीडवरुन परत येऊन रुग्णालयात दाखल होणार आहे. ६ जुलैपासूनचा दौरा हा समाजासाठी असणार आहे.६ जुलैपासून १३ जुलैपर्यंत एकत्र येऊन ताकद दाखवणार आहेत. आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, अशी सरकारला आम्ही विनंती करणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

"आम्हाला तसं आरक्षण द्यायचं नाही तर त्यांनी आमच्याकडे जज कशाला पाठवले होते. आमचं असंच तुम्हाला वाटोळ करायचं आहे का? त्यावेळी त्यांनी आम्हाला का सांगितलं नाही?, सवालही जरांगे पाटील यांनी केला. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

"तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे. सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे, असंही पाटील म्हणाले. आम्ही दोन टप्प्यातील चाचपणी केली आहे. सरकार जर आमच्याविरोधात अशीच आंदोलने उभा करत असेल तर आम्हालाही २८८ उभा करण्याचा विचार करावा लागणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण