शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार"; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:31 IST

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडोण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणासाठी आता लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे. 

Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

 मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आज ते बीड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "बीडवरुन परत येऊन रुग्णालयात दाखल होणार आहे. ६ जुलैपासूनचा दौरा हा समाजासाठी असणार आहे.६ जुलैपासून १३ जुलैपर्यंत एकत्र येऊन ताकद दाखवणार आहेत. आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, अशी सरकारला आम्ही विनंती करणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

"आम्हाला तसं आरक्षण द्यायचं नाही तर त्यांनी आमच्याकडे जज कशाला पाठवले होते. आमचं असंच तुम्हाला वाटोळ करायचं आहे का? त्यावेळी त्यांनी आम्हाला का सांगितलं नाही?, सवालही जरांगे पाटील यांनी केला. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

"तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे. सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे, असंही पाटील म्हणाले. आम्ही दोन टप्प्यातील चाचपणी केली आहे. सरकार जर आमच्याविरोधात अशीच आंदोलने उभा करत असेल तर आम्हालाही २८८ उभा करण्याचा विचार करावा लागणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण