शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

महावितरणपुढे मनपाने टेकले हात

By admin | Updated: June 13, 2014 01:13 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे.

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे. १२ जून रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी फारोळा पंपगृह येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधील २ हजार के.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत १,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी त्यामुळे बंद होती. शहराला पाणीपुरवठाही त्यातून सुरू असतानाच ती जलवाहिनी बंद पडल्यामुळे उद्या १३ जून रोजी अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे, तर काही भागांना पाणीपुरवठा होईल, मात्र उशिरा. असे मनपा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून ती पूर्ण करता-करता पालिका पाणीपुरवठा विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. अधिकारी- नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होण्यापर्यंत वेळ आली आहे, तर नागरिक पालिका आणि महावितरणवर ताशेरे ओढत आहेत. दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, आॅन दी स्पॉट पाहणी झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने १५ लाख देण्याचेही ठरले. ते कामही सुरू झाले आहे; पण सध्या असलेल्या यंत्रणेमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो आहे.दरम्यान, जनतेच्या हितासाठी महापालिकेच्या पदाधिकारी किंवा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा जोे दबाव महावितरणवर असायला हवा तो नसल्यामुळे महावितरण मनमानी पद्धतीने वागत असल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे. माध्यमांमधून पाणीटंचाईचा विषय पुढे आणल्यानंतरच महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जाग आल्याचे चित्र आहे. आठ दिवसांची मुदत आज संपणार महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि मुख्य अभियंता शंकर शिंदे व पथकाने ५ रोजी फारोळा, ढोरकीन येथील महावितरणच्या उपकेंद्रांची पाहणी केली होती. ढोरकीनच्या एक्स्प्रेस फिडर लाईनला १५ लाख रुपये मनपाते तातडीने दिले. त्या कामाला अंदाजे ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. १४ जून रोजी ती मुदत संपत आहे. फिडर लाईनचे काम झाल्यानंतर भविष्यात वीजपुरवठा खंडित होऊन त्रास होणार नाही. आठ दिवसांत ते काम पालिका जातीने लक्ष घालून करून घेणार होती. कशामुळे झाली अडचणपाणीपुरवठ्याच्या जायकवाडीतील योजनांना ज्या सबस्टेशवरून वीजपुरवठा होतो तेथून जालना पाणीपुरवठा योजना व काही उद्योगांना कनेक्शन दिले आहे. महावितरणने आहे त्याच नेटवर्कमधून कनेक्शन दिल्यामुळे औरंगाबाद पाणीपुरवठ्याला उच्च दाबाने वीज मिळत नाही. परिणामी, २० दिवसांपासून सिडको-हडकोसह शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते आहे.