शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महावितरणपुढे मनपाने टेकले हात

By admin | Updated: June 13, 2014 01:13 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे.

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे. १२ जून रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी फारोळा पंपगृह येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधील २ हजार के.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत १,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी त्यामुळे बंद होती. शहराला पाणीपुरवठाही त्यातून सुरू असतानाच ती जलवाहिनी बंद पडल्यामुळे उद्या १३ जून रोजी अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे, तर काही भागांना पाणीपुरवठा होईल, मात्र उशिरा. असे मनपा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून ती पूर्ण करता-करता पालिका पाणीपुरवठा विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. अधिकारी- नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होण्यापर्यंत वेळ आली आहे, तर नागरिक पालिका आणि महावितरणवर ताशेरे ओढत आहेत. दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, आॅन दी स्पॉट पाहणी झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने १५ लाख देण्याचेही ठरले. ते कामही सुरू झाले आहे; पण सध्या असलेल्या यंत्रणेमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो आहे.दरम्यान, जनतेच्या हितासाठी महापालिकेच्या पदाधिकारी किंवा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा जोे दबाव महावितरणवर असायला हवा तो नसल्यामुळे महावितरण मनमानी पद्धतीने वागत असल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे. माध्यमांमधून पाणीटंचाईचा विषय पुढे आणल्यानंतरच महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जाग आल्याचे चित्र आहे. आठ दिवसांची मुदत आज संपणार महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि मुख्य अभियंता शंकर शिंदे व पथकाने ५ रोजी फारोळा, ढोरकीन येथील महावितरणच्या उपकेंद्रांची पाहणी केली होती. ढोरकीनच्या एक्स्प्रेस फिडर लाईनला १५ लाख रुपये मनपाते तातडीने दिले. त्या कामाला अंदाजे ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. १४ जून रोजी ती मुदत संपत आहे. फिडर लाईनचे काम झाल्यानंतर भविष्यात वीजपुरवठा खंडित होऊन त्रास होणार नाही. आठ दिवसांत ते काम पालिका जातीने लक्ष घालून करून घेणार होती. कशामुळे झाली अडचणपाणीपुरवठ्याच्या जायकवाडीतील योजनांना ज्या सबस्टेशवरून वीजपुरवठा होतो तेथून जालना पाणीपुरवठा योजना व काही उद्योगांना कनेक्शन दिले आहे. महावितरणने आहे त्याच नेटवर्कमधून कनेक्शन दिल्यामुळे औरंगाबाद पाणीपुरवठ्याला उच्च दाबाने वीज मिळत नाही. परिणामी, २० दिवसांपासून सिडको-हडकोसह शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते आहे.