शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:36 IST

चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : चौथ्या दिवशीही कचरा टाकण्यास विरोध

औरंगाबाद : चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही. शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील चार दिवसांमध्ये मनपा चांगलीच बॅकफुटवर आली आहे. जुन्या हजारो मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केल्याशिवाय नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी फेबु्रवारी २०१८ मध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर शहराचा कचरा प्रश्न राज्यभर गाजला. विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरताच राज्य शासनाने मनपाला तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रिया, कंत्राटदार निश्चित करणे, शेड उभारणी या कामांमध्ये वर्ष गेले. अद्याप कचºयावर प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून त्यात कचरा साठविण्यात आला. नारेगावप्रमाणे मनपाने कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार करून ठेवले आहेत. भविष्यात या कचºयावर कधी प्रक्रिया करण्यात येईल, हे सुद्धा मनपा ठामपणे सांगू शकत नाही.चिकलठाणा पंचक्रोशीतील शेतकºयांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प त्वरित उभारण्यात यावा या मागणीसाठी मनपाकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे चार महिन्यांमध्ये प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. सहा महिने उलटले तरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, रमेश नवपुते, कारभारी गोरे, संजय गोटे, दिगंबर कावडे, दिलीप रेठे यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारपासून कचरा टाकण्यास विरोध सुरू केला. जुन्या कचºयावर प्रक्रिया झाल्याशिवाय एकही नवीन वाहन आणायचे नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही शेतकºयांनी आंदोलन सुरूच ठेवले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न