शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:36 IST

चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : चौथ्या दिवशीही कचरा टाकण्यास विरोध

औरंगाबाद : चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही. शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील चार दिवसांमध्ये मनपा चांगलीच बॅकफुटवर आली आहे. जुन्या हजारो मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केल्याशिवाय नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी फेबु्रवारी २०१८ मध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर शहराचा कचरा प्रश्न राज्यभर गाजला. विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरताच राज्य शासनाने मनपाला तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रिया, कंत्राटदार निश्चित करणे, शेड उभारणी या कामांमध्ये वर्ष गेले. अद्याप कचºयावर प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून त्यात कचरा साठविण्यात आला. नारेगावप्रमाणे मनपाने कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार करून ठेवले आहेत. भविष्यात या कचºयावर कधी प्रक्रिया करण्यात येईल, हे सुद्धा मनपा ठामपणे सांगू शकत नाही.चिकलठाणा पंचक्रोशीतील शेतकºयांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प त्वरित उभारण्यात यावा या मागणीसाठी मनपाकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे चार महिन्यांमध्ये प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. सहा महिने उलटले तरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, रमेश नवपुते, कारभारी गोरे, संजय गोटे, दिगंबर कावडे, दिलीप रेठे यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारपासून कचरा टाकण्यास विरोध सुरू केला. जुन्या कचºयावर प्रक्रिया झाल्याशिवाय एकही नवीन वाहन आणायचे नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही शेतकºयांनी आंदोलन सुरूच ठेवले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न