शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

चिकलठाण्यात मनपा बॅकफुटवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:36 IST

चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : चौथ्या दिवशीही कचरा टाकण्यास विरोध

औरंगाबाद : चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले नाही. शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील चार दिवसांमध्ये मनपा चांगलीच बॅकफुटवर आली आहे. जुन्या हजारो मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केल्याशिवाय नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी फेबु्रवारी २०१८ मध्ये जोरदार आंदोलन केल्यानंतर शहराचा कचरा प्रश्न राज्यभर गाजला. विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरताच राज्य शासनाने मनपाला तब्बल ९१ कोटींचा निधी मंजूर केला. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रिया, कंत्राटदार निश्चित करणे, शेड उभारणी या कामांमध्ये वर्ष गेले. अद्याप कचºयावर प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून त्यात कचरा साठविण्यात आला. नारेगावप्रमाणे मनपाने कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार करून ठेवले आहेत. भविष्यात या कचºयावर कधी प्रक्रिया करण्यात येईल, हे सुद्धा मनपा ठामपणे सांगू शकत नाही.चिकलठाणा पंचक्रोशीतील शेतकºयांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प त्वरित उभारण्यात यावा या मागणीसाठी मनपाकडे पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे चार महिन्यांमध्ये प्रकल्प सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. सहा महिने उलटले तरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, त्यामुळे शेतकरी बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, रमेश नवपुते, कारभारी गोरे, संजय गोटे, दिगंबर कावडे, दिलीप रेठे यांच्यासह शेतकºयांनी शुक्रवारपासून कचरा टाकण्यास विरोध सुरू केला. जुन्या कचºयावर प्रक्रिया झाल्याशिवाय एकही नवीन वाहन आणायचे नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही शेतकºयांनी आंदोलन सुरूच ठेवले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न