शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

वंचित बहुजन आघाडीत माळी समाजाला हव्यात ५० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:28 IST

१५ सप्टेंबर रोजी अरणला सत्तासंपादन मेळावा 

ठळक मुद्देसध्या माळी समाजाचे १२ आमदार आहेत

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून माळी समाजाला विधानसभेच्या ५० जागा हव्या आहेत. महाराराष्ट्रातत माळी समाजाची संख्या दोन कोटी आहे. आता ८० टक्के समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळला आहे. नाशिक भागातला २० टक्के समाज छगन भुजबळ यांच्याकडे असू शकतो. सध्या माळी समाजाचे १२ आमदार आहेत; परंतु युती शासनात अलीकडेच फक्त एक मंत्री बनवण्यात आला आहे. एकूणच वंचितांना व माळी समाजाला वंचित बहुजन आघाडीकडूनच न्याय मिळू शकेल, असा विश्वास बुधवारी येथे सर्वशाखीय माळी समाज सत्तासंपादन महामेळाव्याचे प्रमुख संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. 

अरण, जि. सोलापूर या संत सावता महाराजांच्या गावी हा महामेळावा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासंबंधीची सविस्तर माहिती लिंगे यांनी दिली.अरण येथे सुमारे एक लाख माळी समाज बंधू-भगिनी जमतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतील. माळी समाजाला शासनकर्ती जमात बनविणे, जातनिहाय जनगणना करणे, सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग दर्जा, पर्यटन क्षेत्राचा दर्जा, सावता महाराजांच्या नावाने वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करणे, संविधान बचाव, आरक्षण संरक्षित करणे या मुद्यांवर महामेळाव्यात चर्चा होईल. पत्रपरिषदेस रामभाऊ पेरकर, गौतम क्षीरसागर, शिवाजी गाडेकर, बाबासाहेब पवार, हरिभाऊ पवार यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते. 

लेना ना देना.... बीजेपी सेना...पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, सध्याचे सरकार वंचितांना न्याय देऊ शकत नाही. प्रश्न सोडवू शकत नाही. लेना ना देना... बीजेपी सेना अशी यांची अवस्था आहे. ६० टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यातही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सेव्ह मेरिट... सेव्ह नेशनच्या आंदोलनाची दखल घेऊन  ओबीसींना वैद्यकीय आरक्षण २ टक्केच देण्याचा  निर्णय केंद्राने घेतला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू आहेत.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद