शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

बसस्थानकातून अपहरण करून मालेगावात नेत विष पाजून व्यावसायिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 6:56 PM

मालेगाव कॅम्प परिसरात व्यावसायिक हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथून केले अपहरण मालेगावला सापडला मृतदेह

औरंगाबाद : तापडिया कासलीवाल मैदानावर एका प्रदर्शनासाठी आलेल्या केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे नेल्यानंतर तेथे विष पाजून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. १९ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथून हे अपहरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा औरंगाबादेतील क्रांतीचौक पोलिसांकडे वर्ग केला. 

अंशुमन नथू वाघ (४१, रा. मालेगाव कॅम्प, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे.  अंशुमन हा केटरिंगचा व्यवसाय करायचा. तापडिया-कासलीवाल मैदानावर आयोजित प्रदर्शनात त्यांचे स्टॉल होते. हे प्रदर्शन १९ मे रोजी समाप्त झाले. २० मे रोजी सकाळी अंशुमन हा आंघोळ करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे गेला. स्वच्छतागृहाजवळ आंघोळीचे कपडे ठेवून तो आंघोळ न करताच बाहेर पडला. दरम्यान २३ मे रोजी मालेगाव कॅम्प परिसरात तो हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी अंशुमनला रुग्णालयात दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांचा जबाब नोंदविला, तेव्हा त्याने दोन अनोळखींनी एका वाहनातून त्याचे औरंगाबादेतील बसस्थानक येथून अपहरण केले. नंतर काही दिवस त्याला फिरविल्यानंतर त्यांनी हात-पाय बांधून विष पाजल्याचे म्हटले.

या जबाबानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी अंशुमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी  वडनेर खाकुर्डी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. अंशुमनचे अपहरण औरंगाबादेतून झाले असल्याने वडनेर खाकुर्डी पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी क्रांतीचौक ठाण्याकडे वर्ग केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राठोड हे तपास करीत आहे. 

सीसीटीव्हीची तपासणीगुन्ह्याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी तपास सुरू केला. तपास पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. शिवाय मृत अंशुमन यांचा मोबाईल २० मे रोजी औरंगाबादेतील त्याच्या प्रदर्शनस्थळीच त्याने ठेवल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली नाही. शिवाय अपहरणकर्त्यांनी वापरलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी अंशुमनचे अपहरण आणि खून का केला, तसेच मारेकरी कोण आहेत, आदी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी