शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अव्वल आयर्नमॅन बनायचेय, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अमित समर्थने बाळगले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 03:15 IST

गतवर्षी रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर रेस अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी देशातील अव्वल आयर्नमन अ‍ॅथलिट बनण्याचे लक्ष्य बाळगले आहे. स्विमिंगविषयी भीती घालवण्यासाठीच आपण आयर्नमन होण्याचे लक्ष्य ठवले, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद - गतवर्षी रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर रेस अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी देशातील अव्वल आयर्नमन अ‍ॅथलिट बनण्याचे लक्ष्य बाळगले आहे. स्विमिंगविषयी भीती घालवण्यासाठीच आपण आयर्नमन होण्याचे लक्ष्य ठवले, असेही त्यांनी सांगितले.गतवर्षी जून महिन्यात जगातील सर्वांत खडतर रेस अक्रॉस अमेरिका ही ५ हजार कि.मी. अंतराची शर्यत ११ दिवस आणि २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण करणारे डॉ. अमित समर्थ औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त रविवारी दाखल झाले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, ‘‘आपण आधी धावपटू होतो आणि स्विमिंगविषयी मनात भीती होती. ही भीती काढण्यासाठी चांगला स्विमर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण आयर्नमन होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे सायकल चालवण्याकडे वळालो. त्यानंतर २०१५ मध्ये डेक्कन क्लिफर हँगर ही पुणे ते गोवा अशी ६४० कि.मी.ची रेस पूर्ण करीत मी ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या शर्यतीसाठी पात्र ठरलो. ४ डिसेंबर २०१६ मध्ये पर्थ येथे ४ कि.मी. जलतरण, १८० कि. मी सायकलिंग आणि ४२ कि.मी. रनिंग ही आयर्नमन रेस पूर्ण केली. त्यासाठी सलग सहा महिने डोंगर आणि हायवेवर सराव केला. आता या वर्षी पुन्हा पुणे ते गोवा ही ६४३ कि.मी.ची रेस आपले लक्ष्य आहे.’’१२ वेळेस अर्ध आयर्नमॅन रेस पूर्ण करण्याचा पराक्रम केलेल्या अमित समर्थ यांनी रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर रेसविषयीही त्यांनी त्यांचा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले, रेस अक्रॉस अमेरिका ही खूपच खडतर आहे. पहिल्या तीन दिवसांतच अनेक जण ही शर्यत सोडतात. कारण येथे क्षमतेचा कस लागतो. वेगवेगळे हवामान. कधी उष्ण तर कधी थंड. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि याचा आपल्यालाही त्रास जाणवला. या रेसचा मार्ग वाळवंट तसेच अनेक शिखर पार करून पूर्ण करावा लागतो. तसेच अनेक उंचच चढ आणि उतार. त्यात अनेक मोठ मोठे खडक मार्गात असतात. या दरम्यान वेस्ट व्हर्जिना येथे तर तब्बल १२ तास मुसळधार पावसाचाही सामना करावा लागला; परंतु निर्धारित वेळेत ही रेस पूर्ण करायची असल्यामुळे कोठेही थांबता येत नव्हते. आवश्यक आहारही सायकलवरच घ्यावा लागत होता. फक्त झोप, विश्रांती अथवा टायर व ट्यूब बदलण्यासाठीच सायकल थांबवता येत होती. रात्रीही गाडीच्या प्रकाशझोतात सायकल चालवावी लागे. आॅरिझोन जंगलातील प्रवास खूपच कठीण होता. पहिल्या दोन दिवसांत ९00 कि. मी. अंतर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आत्मविश्वास उंचावला. या मार्गादरम्यान अ‍ॅरिझोना डेथ झोन आहे. तेथे अनेकांनी शर्यत सोडली.’’महाराष्ट्रात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी शालेय व महाविद्यालयापासून सुरुवात करायला हवी. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात सायकलवर येण्यास सांगायला हवे. सायकल चालवणे हे तंदुरुस्तीसाठीही अनेक दृष्टीने लाभदायक आहे. दररोज किमान अर्धा तास सायकल चालवायला हवी. तसेच सायकल क्लब स्थापन व्हायला हवे.- डॉ. अमित समर्थ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद